September 16, 2024 10:04 AM

views 20

यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांच्या मदतीसाठी भारताचं ऑपरेशन सद्भाव सुरू

  यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केले आहे. या अंतर्गत भारताने व्हिएतनामला 10 लाख डॉलरची मदत पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. काल एका विशेष विमानाने 35 टन साहित्याची मदत व्हिएतनामला रवाना करण्यात आली. त्यात जलशुद्धीकरणाच्या वस्तू, पाण्याचे डबे, गरम चादरी, स्वयंपाकघरातील भांडी आणि सौर कंदील यांचा समावेश आहे. नवी दिल्लीमधून विशेष विमानात दहा टन मदत पुरवठा लाओसला पाठवला आहे.

September 11, 2024 2:05 PM

views 18

यागी चक्रीवादळामुळं व्हिएतनामध्ये १४१ जणांचा मृत्यू, ५९ जण बेपत्ता

व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळ आणि त्यानंतर झालेल्या पूर आणि भुस्खलनामुळे जवळपास १४१ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण बेपत्ता आहेत. व्हिएतनामची राजधानी हानोईमधल्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आज दुपारपर्यंत यात आणखी वाढ होईल अशी शक्यता जल-हवामान विभागाने वर्तवली आहे. थाओ नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होणार असल्याचं त्यांनी कळवलं आहे. चक्रीवादळामुळे व्हिएतनामच्या ईशान्य भागात शनिवारी अनेक ठिकाणी दरड कोसळली. यात निवासी आणि औद्योगिक भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याआधी फिलिपिन्स आणि ची...