December 13, 2025 8:26 PM

views 11

राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासह विविध मुद्दे विधीमंडळात विरोधकांकडून उपस्थित

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृषी क्षेत्रातल्या निधीचा अपव्यय, राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, वाढती गुन्हेगारी इत्यादी मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते आज विधानसभेत बोलत होते. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेलं ३१ हजार कोटी रुपयांचं पॅकेज कागदावरच राहिलं. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजार ५०० रुपये द्यायची घोषणा केली, पण प्रत्यक्षात त्यांना फक्त ८ हजार ५०० रुपये मिळ...