July 2, 2025 3:05 PM July 2, 2025 3:05 PM

views 10

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात मौसमी पावसानं पुन्हा जोर धरला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दक्षिण भारतातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकत असल्यानं कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मुंबईतल्या बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड या उपनगरात दक्षिण मुंबईच्या तुलनेनं अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी स...

January 4, 2025 1:35 PM January 4, 2025 1:35 PM

views 17

उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणात रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू असून प्रवाशांना दाट धुक्यातून मार्ग काढावा लागत आहे. कमी दृश्यमानतेमुळे रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला असून दिल्लीकडे जाणाऱ्या ४९ गाड्या चार तास विलंबानं धावत आहेत. दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवाही काही अंशी विस्कळीत झाली आहे. येत्या दोन दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात काही भागांत दाट धुकं आणि थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज भारतीय हवाम...

January 3, 2025 2:17 PM January 3, 2025 2:17 PM

views 15

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सुमारे ५० उड्डाणांना विलंब झाला. तसंच दिल्लीला जाणाऱ्या २४ रेल्वेगाड्या पाच तास विलंबानं धावत आहेत, असं रेल्वेनं सांगितलं.  

July 1, 2024 1:28 PM July 1, 2024 1:28 PM

views 21

राज्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे नागरीकांची तारांबळ उडाली. सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही काल मुसळधार पाऊस झाला. अजिंठा लेणीतल्या सहस्त्रकुंड धबधब्यासह लहान - मोठे नाले खळखळून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यातही आठवडा भराच्या विश्रांती नंतर काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सुकत असलेल्या पिकांना नव संजीवनी मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांतल्या काही ...