July 30, 2024 8:39 PM

views 18

केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात दरड कोसळून ९३ जणांचा मृत्यू, १२८ जण जखमी

केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या भागात मुसळधार पावसामुळे आज भूस्खलन झाल्यानं ९३ जणांचा मृत्यू झाला तर १२८ हून अधिक जण जखमी झाले. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूस्खलन झालेल्या भागात एनडीआरएफचं पथक, लष्कर तसंच नौदलाचे जवान बचावकार्य करत आहेत. मुंडक्काईच्या डोंगराळ भागातून १५० नागरिकांना वाचवण्यात आलं आहे.   चूरमाला इथं नदीवरचा पूल वाहून गेल्यानं दोरीच्या साहाय्यानं अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. मेप्पडी इथं मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. द...