November 8, 2025 1:31 PM November 8, 2025 1:31 PM
21
वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या भवितव्याचा पाया घालत आहेत, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं चार वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यात वाराणसी-खजुराहो, लखनौ-सहारानपूर, फिरोजपूर-दिल्ली, आणि एर्नाकुलम-बंगळुरू या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे वंदे भारत गाड्यांची संख्या आता १६० झाली आहे. विकसनशील देशांमधल्या पायाभूत सुविधांचा विकास हा त्या देशाच्या आर्थिक विकासात भर टाकत असतो. रेल्वे आणि रस्ते बनतात तेव्हा विकासाला चालना मिळते, आज भारत देखील विकासाच्या मार्गावर वेगानं जात आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केल...