November 28, 2024 1:14 PM

views 24

बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं मंत्री अन्नपूर्णा देवी यांचं प्रतिपादन

केंद्र सरकारच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ या राष्ट्रीय अभियानाचा प्रारंभ काल नवी दिल्ली इथं झाला. बालविवाहाच्या रूढीचं निर्मूलन करणं, हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे. अभियानासाठी  १३० जिल्ह्यांची निवड झाली असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या मोहिमेचं उद्घाटन करताना सांगितलं.   बालविवाह हा केवळ गुन्हाच नव्हे तर मानवी हक्कांचं उल्लंघन आहे असं सांगून मंत्री म्हणाल्या की, बाल विवाह मुक्त भारत मोहीम हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम नसून एक निरंतर चळवळ आहे. अन्नपूर्णा देवी...

August 31, 2024 8:11 PM

views 20

बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची ममता बॅनर्जी यांना विनंती

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आर.जी. कार रुग्णालयामधील बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची विनंती पुन्हा पत्राद्वारे केली आहे.  पश्चिम बंगालमधल्या सध्याच्या जलदगती न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांवर चिंता अन्नपूर्णा देवी यांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये ८८ जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत, पण ती केंद्र सरकारच्या योजनेच्या शिफारशींनुसा...