November 1, 2025 10:08 AM

views 37

पोलीस दलांतील कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं जाहीर, महाराष्ट्रातल्या नऊ जणांचा समावेश

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं काल जाहीर करण्यात आली. एकंदर 1 हजार 466 पोलीस कर्मचाऱ्यांना ही पदकं जाहीर झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या नऊ जणांचा समावेश आहे. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा, न्यायवैद्यक विज्ञान आदी चार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस यंत्रणांतील कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.   तपास विभागात पोलिस निरीक्षक भगवान नारोडे, पल्लवी चव्हाण, उपविभागीय अधिकारी गणपत पिंगळे, किशोर काळे, शर्मिष्ठा वालावलकर, सहा...

April 17, 2025 1:56 PM

views 13

मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचा बीमोड होईल, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

पुढच्या वर्षी मार्चअखेरीपर्यंत देशातून नक्षलवादाचा बीमोड होईल, आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्त्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मध्यप्रदेशात नीमच इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८६व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनने नक्षलविरोधी मोहिमांमधे महत्वाची कामगिरी बजावली आहे असं ते म्हणाले. विविध मोहिमांमधे सीआरपीएफचे २ हजार २६४ जवान शहीद झाल्याचं सांगून त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. विशेष कामगिरी बजावणाऱ...

January 3, 2025 10:27 AM

views 16

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत 'जम्मू काश्मीर ॲण्ड लद्दाख-थ्रू द एजेस' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले. धारा 370 समात्प होने के बाद आतंकवादी घटनाओं मे सत्तर प्रतिशत से ज्यादा कमी हुई है। वो ये सिद्ध करता है कि धारा 370 आतंकवाद की पोषक थी। 2018 में २१०० घटनाये पथराव की हुई थी 2024 मे एक ...

October 10, 2024 2:43 PM

views 10

देशातल्या उद्योगांनी आकारमान आणि क्षमता वाढवावी केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन

देशातल्या उद्योगांनी आकारमान आणि क्षमता वाढवावी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत PHD Chamber of Commerce and Industry च्या वार्षिक संमेलनाला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षात सर्वच क्षेत्रात भारताला आघाडीवर नेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

September 26, 2024 2:30 PM

views 19

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. कठुवा आणि उधमपूर जिल्ह्यातल्या चार प्रचारसभांना ते संबोधित करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २८ सप्टेंबरला जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जम्मूमध्ये प्रचारसभा घेतली. तसंच माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. हरियाणा विधानस...