February 10, 2025 8:16 PM February 10, 2025 8:16 PM

views 8

आज लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा

लोकसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. २०२५-२६ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कॉरपोरेट्सना झुकतं माप देण्यात आलं असून जनतेच्या बेरोजगारी, महागाई या समस्यांकडे दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप द्रमुकचे दयानिधी मारन यांनी केला. भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयानं आजवरची नीचांकी पातळी गाठली आहे, अशी टीका त्यांनी केली.    नोटबंदीच्या वेळी जाहीर केलेलं कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, असं काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी सांगितलं. अर...

February 7, 2025 8:21 PM February 7, 2025 8:21 PM

views 12

केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरु, हा अर्थसंकल्प कृषीआव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्याची काँग्रेसची टीका, तर गरीब, शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा अर्थसंकल्प असल्याची भाजपाची प्रशस्ती

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तर देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यांनी केला.   एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा मुद्दा तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला. तर भाजपाचे राव राजेंद्र सिं...

February 1, 2025 8:03 PM February 1, 2025 8:03 PM

views 9

आगामी आर्थिक वर्षासाठी ५० लाख ६५ हजार कोटी रुपये खर्चाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर /संरक्षण, ग्रामीण विकास, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा, कापूस, डाळी, तेलबियांसाठी विविध योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५० लाख ६५ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असलेला अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक वृद्धीला चालना, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन, सर्वसामान्यांच्या आकांक्षांना उभारी देणारा आणि मध्यमवर्गाला आणखी बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं स...

July 24, 2024 8:33 PM July 24, 2024 8:33 PM

views 15

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या निधी वाटपात भेदभाव केल्याचे आरोप फेटाळले

केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांना काहीही दिलं नाही असा भ्रम काँग्रेस पसरवत असल्याचं सीतारामण यांनी राज्यसभेत शून्य प्रहरातल्या चर्चेवेळी सांगितलं. अर्थसंकल्पाच्या भाषणावेळी प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं. नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही असं नाही, असं सीतारामण यांनी स्पष्ट केलं. लेखानुदान आणि कालच्या अर्थसंकल्पादरम्यान महाराष्ट्र ...