December 16, 2025 8:38 PM

views 101

U-19 Asia Cup 2025: भारताचा मलेशियावर ३१५ धावांनी विजय

१९ वर्षाखालच्या, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं मलेशियावर ३१५ धावांनी विजय मिळवला. मलेशियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर भारतानं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून ४०८ धावा केल्या. त्यात अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे. त्यानं नाबाद २०९ धावा केल्या. त्यात १७ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. वेदांत त्रिवेदीनं ९०, तर वैभव सूर्यवंशीनं ५० धावांचं योगदान दिलं. मलेशियातर्फे मुहम्मद अक्रमनं पाच गडी बाद केले.   भारताच्या ...