November 21, 2025 7:51 PM November 21, 2025 7:51 PM

views 6

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात भारताला यश

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात भारतानं यश मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग अहवाल -२०२५ नुसार भारतात क्षयरुग्णांच्या संख्येत २१ टक्के घसरण झाल्याचं नमूद केलं आहे. २०१५ मधे क्षयरुग्णांचं प्रमाण १ लाखात २३७ इतकं होतं, ते २०२४ मधे १ लाखात १८७ इतकं खाली आलं आहे. याच कालावधीत क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही २५ टक्क्यानं घटलं आहे, तर उपचार मिळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५३ टक्क्यावरुन ९२ टक्क्यापर्यंत वाढलं आहे.

December 8, 2024 1:42 PM December 8, 2024 1:42 PM

views 10

क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशाच्या टीबी विरोधातल्या लढ्यात, अधिक रुग्णसंख्या असलेल्या टीबी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून १०० दिवसांच्या विशेष मोहीमेमुळे देश बळकट झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरील एका संदेशात मोदी यांनी सांगितलं की, रुग्णांना दुप्पट मदत, जन भागिदारी, नवीन औषधं, तंत्रज्ञानाचा वापर आणि निदानाची उत्तम साधनं यासह भारत विविध पद्धतींनी टीबीशी लढा देत आहे. क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियाना...