November 26, 2025 3:17 PM November 26, 2025 3:17 PM

views 9

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना आणि मालिकाही भारतानं गमावली

गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला असून ही मालिका भारताने गमावली आहे. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारतासमोर ५५० धावांचं आव्हान होतं. आज पाचव्या दिवशी २ बाद २७ वरून सुरू झालेला भारताचा डाव अवघा १४० धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ तर दुसऱ्या डावात २६० धावा केल्या होत्या. भारताचा संघ पहिल्या डावात २०१ तर दुसऱ्या डावात १४० धावा करून तंबुत परतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं हा सामना ४०८ धावा...

November 14, 2025 6:21 PM November 14, 2025 6:21 PM

views 21

पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव १५९ धावांवर

कोलकाता इथं इडन गार्डनमध्ये आज सुरु झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर १ गडी गमावून ३७ धावा केल्या.    दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. एडन मार्क्रमच्या ३१ धावा ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं अवघ्या २७ धावा देत ५ बळी घेतले. महमंद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद ...

October 11, 2025 7:00 PM October 11, 2025 7:00 PM

views 49

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान नवी दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्या पहिल्या डावात ४ गडी बाद १४० धावा केल्या आहेत.    त्याआधी, भारतानं आपला  पहिला डाव ५ बाद ५१८ धावसंख्येवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद राहिला. गिलने एकाच कॅलेंडर वर्षात पाच शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाचीही आज बरोबरी केली. कालच्या २ बाद ३१८ धावसंख्येवरुन आपला पहिला डा...

June 24, 2025 8:18 PM June 24, 2025 8:18 PM

views 12

𝐀𝐧𝐝𝐞𝐫𝐬𝐨𝐧-𝐓𝐞𝐧𝐝𝐮𝐥𝐤𝐚𝐫 𝐂𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐓𝐫𝐨𝐩𝐡𝐲: इंग्लंडची विजयी लक्ष्याच्या दिशेनं दमदार वाटचाल

भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या अँडरसन - तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, आज पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडनं विजयी लक्ष्याच्या दिशेनं दमदार वाटचाल सुरू केली. या सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज अखेरच्या दिवशी इंग्लडनं दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावांवरून या लक्ष्याचा पाठलाग सुरू केला, आणि दुसऱ्या सत्रापर्यंत भारताच्या गोलंदाजांना एकही बळी मिळू न देता, पावणेदोनशे धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडचा सलामीवीर बेन डक...

June 23, 2025 8:38 PM June 23, 2025 8:38 PM

views 7

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांची शतकं

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, आज चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली.ऋषभ पंत ११८ धावांवर बाद झाला. मात्र केएल राहुल शतक झळकवल्यानंतरही अजून खेळतो आहे.    भारतानं कालच्या दोन बाद ९० धावांवरुन आज पुढचा खेळ सुरू केल्यानंतर कर्णधार शुभमन गील ८ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर राहुल आणि पंत यांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या ४ बाद २९७ धावा झाल्या ...

December 7, 2024 7:31 PM December 7, 2024 7:31 PM

views 7

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५ लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड जगातला पहिला संघ ठरला

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाच लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड हा जगातला पहिला संघ ठरला आहे. एकूण १ हजार ८२ सामने खेळून आणि ७१७ खेळाडूंच्या  सहभागातून इंग्लंडने हा विक्रम नोंदवला आहे.    इंग्लंड संघाने १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा संघही इंग्लंड आहे.    कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलिया संघाचा तर भारतीय संघाचा तिसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलिया संघाच्या ४ लाख, ...

November 24, 2024 7:59 PM November 24, 2024 7:59 PM

views 9

कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, तिसऱ्या दिवसअखेर विजयासाठी ५३४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ३ बाद १२ धावा झाल्या आहेत.   आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात कालच्या बिनबाद १७२ या धावसंख्येत आणखी ३१५ धावांची भर घालत ६ बाद ४८७ या धावसंख्येवर डाव घोषित केला. पहिल्या डावात भारतानं ४६ धावांची आघाडी मिळवली होती.    काल ९० धावांवर नाबाद असलेल्या यशस्वी जयस्वालनं शतक पूर्ण करत १६१ धावा...

November 4, 2024 11:10 AM November 4, 2024 11:10 AM

views 8

कसोटी क्रिकेट मालिकेत भारताचा पराभव

भारतीय क्रिकेट संघातील वरच्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमवावी लागली. 2000 नंतर पहिल्यांदा भारतीय संघाला देशात झालेल्या कसोटी मालिकेतला एकही सामना जिंकला आलेला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 25 धावांनी पराभव केला, आणि मालिका 3-0 अशी जिंकली.   सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काल सकाळच्या सत्रात न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 ...

November 2, 2024 7:02 PM November 2, 2024 7:02 PM

views 11

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर मोठी आघाडी घेण्याची संधी भारतानं गमावली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशीही दोन्ही संघांचे मिळून १५ गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या होत्या. भारताच्या वतीनं रविंद्र जडेजा यानं न्यूझीलंडचे ४ तर रविचंद्रन अश्विन यानं ३ गडी बाद केले. न्यूझीलंडच्या वतीनं यंग वील यानं सर्वाधिक ५१ धावा केल्या.    त्याआधी आज भारतानं पहिल्या डावात न्यूझीलंडवर नाममात्र २८ धावांची आ...

September 30, 2024 7:35 PM September 30, 2024 7:35 PM

views 9

कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारताची बांगलादेशावर २६ धावांची आघाडी

कानपूर इथं सुुरु असलेल्या बांगलादेशाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारतानं २६ धावांची आघाडी घेतली.  बांगलादेशाचा पहिला डाव आज २३३ धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात ९ बाद २८५ धावा झाल्या असताना डाव घोषित केला. दुसऱ्या डावात आजचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशाच्या २ बाद २६ धावा झाल्या होत्या.