November 26, 2025 3:17 PM November 26, 2025 3:17 PM
9
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना आणि मालिकाही भारतानं गमावली
गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला असून ही मालिका भारताने गमावली आहे. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारतासमोर ५५० धावांचं आव्हान होतं. आज पाचव्या दिवशी २ बाद २७ वरून सुरू झालेला भारताचा डाव अवघा १४० धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ तर दुसऱ्या डावात २६० धावा केल्या होत्या. भारताचा संघ पहिल्या डावात २०१ तर दुसऱ्या डावात १४० धावा करून तंबुत परतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं हा सामना ४०८ धावा...