September 20, 2025 3:43 PM

views 39

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अबुधाबी इथं ओमानविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने टी-ट्वेंटीमधला आपला शंभरावा बळी घेतला.   अर्शदीपचा हा सदुसष्ठावा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना होता. अफगाणिस्तानच्या राशिद खानने ५३ सामन्यांमध्ये तर श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने ६३ सामन्यांमध्ये १०० बळींचा विक्रम केला आहे. अर्शदीप हा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यात 100 बळी घेणारा जगातला तिसरा सर्वात जलद गोलंदाज ठरला आहे.

June 30, 2024 8:41 PM

views 26

क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यानं आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. समाज माध्यमावरच्या संदेशातून जडेजानं ही घोषणा केली. फेब्रुवारी २००९मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून जडेजानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं टी २०मध्ये एकूण ७४ सामन्यात ५१५ धावा केल्या असून गोलंदाजीत ७४ बळीही घेतले आहेत.