November 9, 2025 9:58 AM November 9, 2025 9:58 AM

views 23

भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका २-१ नं जिंकली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीस षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. मालिकेतला निर्णायक पाचवा सामना काल पावसामुळं रद्द करावा लागला. त्यामुळं चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघानं मालिका जिंकल्याचं घोषित करण्यात आलं. भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. या विजयामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकण्याची गेल्या १७ वर्षांपासूनची परंपरा भारतानं कायम राखली आहे.

September 12, 2025 12:03 PM September 12, 2025 12:03 PM

views 17

अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा

भारतात होणाऱ्या अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा करण्यात आली आहे. खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. दीपिका टी. सी. कडे संघाची धुरा सोपवण्यात आली असून गंगा एस. कदम उप-कप्तान असेल.    

April 25, 2025 3:00 PM April 25, 2025 3:00 PM

views 19

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान आजचा सामना

आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान होणार आहे.चेन्नई इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरु होईल.    बेंगळुरू इथे झालेल्या कालच्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्स संघाचा ११ धावांनी पराभव केला.

February 2, 2025 8:10 PM February 2, 2025 8:10 PM

views 14

Women’s U19 T20 World Cup: महिला क्रिकेटमध्ये, 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतपद

महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवत, विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावात गारद झाला.   भारताच्या गोंगदी त्रिशानं सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर पारुनिका सिसोदिया,आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन आणि शबनम शकिल हिनं एक गडी बाद केला. विजयासाठी ८३ धावांचं लक्ष्या भारतानं एका गड्याच्या बदल्यात बाराव्या षटकातच पार केलं. गोंगदी त्रिशा...

February 2, 2025 8:09 PM February 2, 2025 8:09 PM

views 19

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरु / अभिषेक शर्मानं झळकावलं ३७ चेंडूत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे सेटेडिअमवर होत आहे. इंगलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅम्सन फटकेबाजी करताना १६ धावांवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक ठोकलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १२ षटकात ३ बाद १६१ धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारतानं ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.

January 18, 2025 2:49 PM January 18, 2025 2:49 PM

views 13

19 वर्षांखालील महिलांच्या वीस षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेला आज मलेशियात सुरूवात

महिला क्रिकेटमधे १९ वर्षांखालील ट्वेंटी- ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून मलेशिया इथं सुरूवात होत आहे. यामध्ये १९ संघ सहभागी होत आहेत. या संघाची चार गटात विभागणी केली असून, भारताच्या गटात मलेशिया, श्रीलंका, वेस्टइंडिज हे संघ आहेत. भारताचा पहिला गटसाखळी सामना उद्या वेस्टइंडिजबरोबर होणार आहे. आज सहा साखळी सामने होणार आहेत.

January 12, 2025 2:52 PM January 12, 2025 2:52 PM

views 14

इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. सुर्यकुमार यादव संघाचा कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असेल. मोहम्मद शमी एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय क्रिकेट संघात परतत आहे.   संघातल्या इतर खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. मालिकेतील पहिला सामना २२ ज...

December 20, 2024 6:18 PM December 20, 2024 6:18 PM

views 233

वेस्ट इंडिज विरुद्धची टी-२० मालिका भारतीय महिला संघानं जिंकली

महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ६० धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली.   भारतानं दिलेलं २१८ धावांचं लक्ष्य गाठताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ १५७ धावा करु शकला. भारताकडून राधा यादव हिने चार गडी बाद केले. ऋचा घोषने महिलांच्या टी-२० क्रिकेट प्रकारात आजवर सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. तिने अवघ्या १८ चेंडुंत ५० धावा केल्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं तर...

December 18, 2024 11:10 AM December 18, 2024 11:10 AM

views 10

महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात वेस्टइंडिजचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजनं काल नवी मुंबईत झालेल्या २० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघाची १-१ अशी बरोबर झाली आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हैले मॅथ्यूजनं ८५ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. भारतानं वेस्टइंडिजसमोर १६० धावाचं लक्ष्य ठेवलं होतं.

July 30, 2024 11:24 AM July 30, 2024 11:24 AM

views 11

भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा आज तिसरा क्रिकेट सामना

भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज भारत आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज संध्याकाळी श्रीलंकेतल्या पल्लेकेले मैदानावर खेळला जाणार आहे.   भारतीय संघानं आधीचे दोन सामने जिंकून आघाडी घेतली असल्यानं भारतानं या मालिकेचं विजेतेपद याआधीच निश्चित केलं आहे. आजचा सामना जिंकून या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.