April 8, 2025 8:50 PM

views 21

नवीन वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्य मंत्रीमंडळानं आज नवीन वाळू धोरणाला मंजुरी दिली. याअंतर्गत घरांच्या बांधकामांसाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नव्या धोरणात डेपो पद्धत बंद करुन वाळू घाटांची निविदा काढली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.     धरणांमधून वाळू उत्खनन करुन त्यांची क्षमता वाढवण्यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं ते म्हणाले. मंत्रीमंडळाच्या पुढच्या बैठकीत कृत्रिम वाळू धोरण आणलं जाणार असून दगडापासून ही वाळू बनवण्याचं नियोजन आहे. यापुढे सर्व सरकारी बांधकामांस...

January 2, 2025 7:35 PM

views 15

आकारी पड जमिनीसंदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पड जमिनीसंदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते.   या सुधारणांमुळे, शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जातील. अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरचं व्याज १२ वर्षाच्या आत भरलं तर मूळ खात...

September 30, 2024 9:04 PM

views 21

राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

राज्यातले होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, विशेष शिक्षकांच्या पावणे ५ हजारांहून अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य सरकारनं आज घेतले. होमगार्डला मानधन ५७० रुपयांवरुन १ हजार ८३ रुपये होईल. याशिवाय उपहार, कवायत, खिसा, भोजन असे विविध भत्ते दिले जातील.  कोतवालांना मानधनात १० टक्के वाढ आणि अनुकंपा धोरण राज्य सरकार लागू करणार आहे. ग्राम रोजगार सेवकांना आता ७ हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. याश...

September 5, 2024 7:54 PM

views 22

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १२१ % पाऊस, १०२ % क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

यंदा राज्यात १२१ टक्के पाऊस झाला आहे. तसंच राज्यात १०२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात २०१८ नंतर पहिल्यांदाच मोठी धरणं शंभर टक्के भरली असल्याची माहिती आज मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख लाभार्थ्यांना ४ हजार ७८७ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं. या योजनेमुळं अन्य योजना बंद होणार नाहीत. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबिया...