June 14, 2024 11:56 AM

views 47

कुवेतमधून भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार

कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार आहेत. मृतांमध्ये केरळमधले २३ नागरिक असल्यामुळे हे विमान आधी कोचीमध्ये उतरेल आणि त्यानंतर दिल्लीला रवाना होईल अशी माहिती कुवेतमधल्या भारतीय वकीलातीनं दिली आहे. दरम्यान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग काल कुवेतला पोहोचले असून मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणण्यासाठी आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी त्यांनी कुवेतमधल्या सरकारसोबत चर्चा केली. तसंच रुग्णालयात जाऊन ...