September 26, 2024 7:02 PM

views 24

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी ४०० कोटी रुपये मंजूर

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं ४०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या वाटद, राजापूर, मंडणगड इथं एमआयडीसीसह आणखीही  काही प्रकल्प उभारले जाणार आहेत.