November 20, 2025 7:28 PM November 20, 2025 7:28 PM

views 13

मतदार यादी पुनरीक्षणाच्या दुसऱ्या टप्पात ५० कोटींहून अधिक अर्ज वितरित

नोव्हेंबर महिन्याच्या ४ तारखेला मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून ५० कोटींहून अधिक गणना अर्ज वितरित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.   उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १५ कोटी ३७ लाख गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ७ कोटी ६४ लाखांहून जास्त अर्ज वितरित झाले आहेतय दुसऱ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया सुरू केली असून पुढच्या महिन्यात ४ तारखेपर्यंत हा टप्पा सुरू राहील.

November 4, 2025 2:29 PM November 4, 2025 2:29 PM

views 52

मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू

निवडणूक आयोगाने आजपासून एसआयआरचा म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून  एकंदर ५१ कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाणार आहे. या मतदारांची पडताळणी करून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. यापूर्वी बिहारमध्ये पडताळणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यात मतदारांच्या पडताळणीनंतर सात कोटी ४२ लाख मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.   दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगड, गोवा, गुजरात, के...

October 27, 2025 7:50 PM October 27, 2025 7:50 PM

views 39

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार-ECI

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. मतदारयाद्या अधिक पारदर्शक आणि निर्दोष करणं हे याचं उद्दिष्ट आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुसऱ्या टप्प्यात सखोल पुनरीक्षण टप्प्याटप्प्याने राबवलं जाईल, असं ज्ञानेश कुमार म्हणाले. एकही मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि चुकीची व्यक्ती यादीत समाविष्ट होऊ नये ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. 

October 7, 2025 2:24 PM October 7, 2025 2:24 PM

views 67

मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण देशभरात करण्यात येणार

मतदार यांद्यांच्या सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया देशभरात राबवण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केलं.  ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. देशभरात मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग तयारी करत असून याच्या तारखा निश्चित करून लवकर याची घोषणा करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.  निवडणूक आयोगाने बिहारमधे सखोल पुनरिक्षणाची प्रक्रिया नुकतीच केली, यात ६९ लाख जणांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं. त्यानंतर बिहारमधे मतदारांची संख्या ७ कोटी ४३ ...