October 10, 2024 4:35 PM

views 24

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल या ग्रामपंचायतींचा सत्कार केला. २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे, त्यानुसार क्षयरोगमुक्त पंचायत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्व ग्रामपंचायतींनी यात सक्रीय सहभाग घेत मोहीम यशस्वी केली.

October 9, 2024 3:34 PM

views 18

रत्नागिरीतल्या ५ नव्याने सुशोभित स्थानकांचं लोकार्पण

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं लोकार्पण आज सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं.  याच कार्यक्रमातून जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचं लोकार्पण देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.           सुशोभिकरणानंतर रेल्वेस्थानकं विमानतळा...

October 8, 2024 7:38 PM

views 20

रत्नागिरीतल्या साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या बंदरासाठी १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. साखरीनाटे, रत्नागिरी तालुक्यातलं मिरकरवाडा आणि दापोली तालुक्यातलं हर्णै ही जिल्ह्यातल्या मच्छिमारांना ताकद देणारी बंदरं आहेत, असं प्रतिपादन उदय सामंत यांनी केलं. 

October 8, 2024 3:41 PM

views 13

रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण

रत्नागिरीतमधल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल झालं. शिवसृष्टीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पणही सामंत यांनी केली. ही शिवसृष्टी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी साकारली असून दोन महिन्यात हिचं काम पूर्ण होईल, असं सामंत यावेळी म्हणाले.   दरम्यान, रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठीच्या कामाला मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल सुरुवात झाली. शहरातल्या शाळा, ...

September 26, 2024 7:02 PM

views 24

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी ४०० कोटी रुपये मंजूर

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं ४०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या वाटद, राजापूर, मंडणगड इथं एमआयडीसीसह आणखीही  काही प्रकल्प उभारले जाणार आहेत.

August 31, 2024 7:40 PM

views 21

रत्नागिरीत सायन्स गॅलरीचं लोकार्पण

रत्नागिरी शहरातल्या बाळासाहेब ठाकरे तारांगणात उभारण्यात आलेल्या सायन्स गॅलरीच लोकार्पण आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्याचप्रमाणे त्यांच्या चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं, या दृष्टीनं या गॅलरीची उभारणी करण्यात आली असून यात विविध मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.

August 23, 2024 7:25 PM

views 33

रत्नागिरीतल्या ३११ गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबद्द्लची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधल्या ३११ गावांचा समावेश आहे. या अहवालानुसार चिपळूणमधल्या ४४, खेडमधल्या ८५, खेडमधल्या २५, लांजा तालुक्यातल्या ५०, राजापूरमधल्या ५१ आणि संगमेश्वर तालुक्यातल्या ८१ गावं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येत आहेत. स्थानिक नागरिकांनी आपल्या हरकती ६० दिवसांमध्ये मंत्रालयाकडे कळवाव्यात असं मंत्रालयाकडून कळवण्यात आलं आहे.

August 19, 2024 10:10 AM

views 7

संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरीत निबे कंपनीची १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

राज्याचा उद्योग विभाग आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारी निबे लिमिटेड कंपनी यांच्यात काल रत्नागिरीमध्ये सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातला आणखी एक नवा प्रकल्प रत्नागिरीत आणला जात असून, त्यातून 10 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, असं सामंत यांनी ...

July 25, 2024 7:43 PM

views 32

‘रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी’

रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी इथं केली. रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी ते बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी आज रत्नागिरीत विविध आढावा बैठका घेतल्या.

July 20, 2024 2:49 PM

views 29

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली.