November 21, 2025 5:47 PM November 21, 2025 5:47 PM

views 22

रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचं २२ नोव्हेंबरला आयोजन

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळातर्फे २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीच्या नवनिर्माण शिक्षण संस्थेत रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार असून, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. चरित्रकार धनंजय कीर यांचं नाव संमेलनस्थळाला देण्यात आलं आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, युवा कवी अनंत राऊ...

October 16, 2025 7:08 PM October 16, 2025 7:08 PM

views 53

रत्नागिरीत शिवसेनेच्या बूथप्रमुखांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीतल्या शिवसेनेच्या तीन हजार बूथप्रमुखांना मेळाव्यात मार्गदर्शन केलं. तसंच रत्नागिरीत उभारलेल्या कोकणातल्या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचं अनावरणही त्यांनी केलं.    शहरातल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या प्रांगणात ही शिल्पं उभारली असून, मोडीत काढलेल्या वाहनांच्या सुट्या भागांपासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ती साकारली आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय ...

September 20, 2025 3:22 PM September 20, 2025 3:22 PM

views 41

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता मोहीम

जागतिक किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ या उपक्रमांतर्गत आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, विविध शाळांचे विद्यार्थी आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.   प्लास्टिक पिशव्या टाळण्याचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं वितरण, तसंच नारळाच्या झाडाचं रोप लावण्यात आलं आणि सर्वांनी यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली.

July 27, 2025 3:13 PM July 27, 2025 3:13 PM

views 47

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा बंदरात विविध विकासकामांचं भूमीपूजन

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा बंदरातल्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आज  मत्स्यव्यवसायविकास आणि बंदरविकास मंत्री नितेश राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. हे प्रकल्प येत्या १८ महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असलं तरी ते १२ महिन्यातच पूर्ण करावे असं राणे यांनी यावेळी सांगितलं. बंदरविकासाचा हा दुसरा टप्पा सुमारे २२ कोटी रुपये खर्चाचा असून त्यात लिलावगृह, जाळी विणण्याची जागा, कुंपणाची भिंत, इत्यादी कामांचा समावेश आहे.   नाटे आणि हर्णै इथल्या बंदरांसाठी राज्यशासनाने प्रत...

May 24, 2025 2:29 PM May 24, 2025 2:29 PM

views 11

रत्नागिरीत १३ बांगलादेशी नागरिकांचं मायदेशी प्रत्यार्पण

रत्नागिरी जिल्ह्यात  बेकायदेशीरपणे  वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांचं शिक्षेनंतर मायदेशी प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या नागरिकांची सहा महिन्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्यात आलं.   भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी  पारपत्र  अधिनियम आणि परदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व १३ जणांची  मायदेशी प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आल्याचं रत्नागिरी पोलि...

May 15, 2025 3:49 PM May 15, 2025 3:49 PM

views 54

रत्नागिरीत मिलन वृद्धाश्रमाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातल्या टाकेडे गावात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिलन’ या  वृद्धाश्रमाचं उद्घाटन झालं.  पूर्वी कुटुंबव्यवस्था शक्तिशाली असल्यानं आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नव्हती, मात्र आता काही सामाजिक कारणांमुळे त्यांची गरज भासू लागली आहे, असं त्यांनी सांगितलं.. त्यादृष्टीनं राज्यात पहिल्या पाच वृद्धाश्रमांमध्ये स्थान मिळवू शकणारा प्रकल्प इथे उभा राहिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. भारत हा आज युवा देश म्हणून ओळखला जातो. मात्र २०३५ नंतर...

April 9, 2025 7:25 PM April 9, 2025 7:25 PM

views 25

रत्नागिरीत टँकरनं पाणीपुरवठा

रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवू लागल्यानं जिल्ह्यात सर्वप्रथम रत्नागिरी तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या २५ वाड्यांना टँकरनं पाणी पुरवलं जात आहे. चिपळूण तालुक्यातल्या १४ गावांनी तर राजापूर आणि मंडणगड तालुक्यातल्या प्रत्येकी दोन गावांनी टँकरची मागणी केली आहे. रत्नागिरी शहरात आता दर सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातला पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरण्याचा अंदाज असल्यानं  पालिकेनं हे नियोजन केलं आहे.

April 9, 2025 7:22 PM April 9, 2025 7:22 PM

views 36

देवरहाटी जमिनींवरच्या विकासकामांसाठी अहवाल सादर करण्याचे महसूल राज्यमंत्र्यांचे आदेश

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवरहाटी जमिनींवरच्या विकासकामांसाठी येत्या १५ दिवसांत महसूल आणि वन विभागाने अहवाल सादर करावेत, असे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज दिले. कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. देवरहाटी जमिनीच्या विकासाचा प्रश्न संवेदनशील असला तरी न्यायालयीन निर्णय, कायदेशीर बाबी आणि स्थानिक जनतेच्या भावना यांचा समतोल राखूनच निर्णय घेतला जाईल, असंही कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.

March 16, 2025 6:50 PM March 16, 2025 6:50 PM

views 34

सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं सत्ताधाऱ्यांचं कारस्थान – काँग्रेस

कोकणात सापडलेली खनिजं आणि नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योगपतींना देण्याचा सरकारचा मानस आहे. उद्योगपतींना लूट करता यावी यासाठी इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान सत्ताधाऱ्यांकडूनच केलं जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते आज रत्नागिरीत, पत्रकार परिषदेत बोलत होते.   कोकणातल्या सामाजिक वातावरणाचे पडसाद मुंबईत उमटतात असं सांगून 'रत्नागिरी-सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं भाजपचं काम सुरू आहे', असा आरोप त्यांनी केला. 'औरंगजेब हा क्रूर शासक होता. त...

March 12, 2025 7:11 PM March 12, 2025 7:11 PM

views 15

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या मानापमानावरून होनारे वाद मिटवण्यात पोलिसांना यश

रत्नागिरी जिल्ह्यातल्या २४ गावांमध्ये शिमगोत्सवाच्या मानापमानावरून काही वाद होत होते, मात्र पोलिसांनी पुढाकार घेतल्याने २४ पैकी १९ गावांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलं आहे.   अन्य गावांमध्येही वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.