August 27, 2025 6:27 PM

views 17

पंजाबमध्ये रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण

पंजाबमधे रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. रणजित सागर धरण आणि पोंग धरणांनी कमाल क्षमता गाठली असून गेल्या आठवड्यापासून भाक्रा धरणातून नियंत्रित पद्धतीनं पाणी सोडण्यात आलं.   सखल भागात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी किंवा मदत छावण्यांमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित क्षेत्रात अडकलेल्यांसाठी सेनादल, बीएसएफ, एनडीआरएफ आणि पंजाब पोलिसांची पथकं बचावकार्य करत असून गरज असेल तिथं हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. येत्या ३० ऑगस्टपर्यंत स...