March 2, 2025 8:11 PM

views 22

विदर्भाची तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी

विदर्भ क्रिकेट संघानं आज रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा आपल्या नावे केलं. नागपूर इथं विदर्भ आणि केरळ यांच्यात झालेला अंतिम सामना आज अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या ३७ धावांच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदाला गवसणी घातली.  आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी विदर्भाच्या दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा झाल्या असताना, दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यावर सहमती दर्शवली.   या सामन्यात पहिल्या डावात १५३, आणि दुसऱ्या डावात ७३ धावांची खेळी केलेल्या विदर्भच्या दानीश...

January 30, 2025 8:06 PM

views 19

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची सामन्यावर मजबूत पकड

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत सुरु झालेल्या मेघालयाविरुद्धच्या सामन्यावर मुंबईनं पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली आहे. मुंबईनं नाणेफेक जिंकून मेघालयाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि ८६ धावात त्यांचा पहिला डाव गुंडाळला. शार्दुल ठाकुरनं ४, मोहित अवस्थीनं ३, सिल्वेस्टर डिसुझानं २, तर शम्स मुलाणीनं १ गडी बाद केला.   त्यानंतर, मुंबईनं पहिल्या डावात दिवसअखेर २ बाद २१३ धावा करत १२७ धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सिद्धेश लाड ८९, तर कर्णधार अजिंक्य राहणे ८३ धावांवर खेळत होता....