October 11, 2025 7:05 PM

views 63

महाराष्ट्र रणजी संघात बीडच्या सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून निवड

बीसीसीआयच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्र रणजी संघात बीडचा यष्टिरक्षक, फलंदाज आणि सातारा वॉरियर्सचा कर्णधार सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून  निवड झाली आहे. सौरभच्या निवडीबद्दल अनेक स्तरातले मान्यवर आणि क्रिकेटप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरचा अंकित बावणे महाराष्ट्राचं  कर्णधार पद भुषवणार आहे. महाराष्ट्राच्या संघात ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, जलज सक्सेना, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, रणजीश ...

February 21, 2025 7:49 PM

views 20

रणजी करंडक : विदर्भ आणि केरळनं पटकावलं अंतिम सामन्यात स्थान

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. नागपुरात झालेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं मुंबईवर ८० धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. विजयासाठी विदर्भानं दिलेल्या ४०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा, दुसरा डाव ३२५ धावांवर संपला. या डावात, विदर्भातर्फे हर्ष दुबेनं ५ गडी बाद केले. मुंबईनं आपला दुसरा डाव कालच्या ३ बाद ८३ या धावसंख्येवरून पुढे सुरू केल्यानंतर शिवम दुबे, सुर्यकुमार यादव आणि आणि आकाश आनंद हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर शम्स मुलानी आण...