November 15, 2025 7:05 PM November 15, 2025 7:05 PM

views 17

निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक-रमेश चेन्निथला

निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक असून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि ताकदीनं उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. मुंबईत आज काँग्रेसचं एकदिवसीय शिबीर झालं त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस ही एक विचारधारा आहे, काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे काँग्रेस कधीच संपत नाही असं चेन्निथला म्हणाले. निवडणुकीत हार-जीत होतच असते, पण सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. नकारात्मकता सोडून लढाऊ बाणा अंगी बाळगा, असं आवा...

November 18, 2024 7:42 PM November 18, 2024 7:42 PM

views 40

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा रमेश चेन्नीथला यांचा आरोप

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर होत असून निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवण्याची मागणी आपल्या पक्षानं याच कारणासाठी केली होती, मात्र अजूनही पोलीस दलाकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

October 30, 2024 5:15 PM October 30, 2024 5:15 PM

views 103

मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिला नसून. कोणत्याही मतदार संघात मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.  महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागांवरही भाजपानंच उमेदवार दिले असून या दो...

October 15, 2024 7:04 PM October 15, 2024 7:04 PM

views 17

राज्यातल्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सज्ज – रमेश चेन्नीथला

राज्यातल्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सज्ज असून आघाडी २८८ जागांवर लढणार आहे, असं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.  राज्याच्या तिजोरीत पैसै नाहीत, निधीची तरतूद नसतानाही दोन महिन्यात युती सरकारने जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली.