July 5, 2025 7:30 PM

views 34

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्ता असताना ते काहीही करू शकले नाही. तरी त्यांना पुन्हा सत्ता हवी असल्याचं फडणवीस म्हणाले. दोन्ही भावांना एकत्र आणल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

August 5, 2024 7:17 PM

views 21

जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना माध्यमांनी स्थान देवू नये – राज ठाकरे

राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून, जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना माध्यमांनी स्थान देऊ नये, असं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.