September 20, 2025 8:24 PM

views 30

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २ वर्षात सुरू होणार असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

महत्त्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा सूरत ते बिलमोरा हा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या बुलेट ट्रेन मार्गावरच्या घणसोली ते शीळफाटा यादरम्यानच्या बोगद्याचं जोडकाम वैष्णव यांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं, त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकल्पाचा ठाण्यापर्यंतचा टप्पा २०२८ पर्यंत, तर वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंतचा भाग त्यापुढच्या वर्षी पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.   घणसोली ते शीळफाटा हा ४ पूर्णांक ९ दशांश किलोमीटर...

November 25, 2024 2:26 PM

views 24

२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीने झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन

संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता . असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं महाराष्ट्रात नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. २००४ ते २०१४ या १० वर्षात रेल्वेमधे ४ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती झाली होती परंतु २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली ...