January 6, 2026 7:21 PM

views 75

‘यूटीएस ॲप’ १ मार्चपासून पूर्णपणे बंद?

मुंबई उपनगरीय गाड्या आणि अनारक्षित तिकिटांसाठी वापरलं जाणारं 'यूटीएस ॲप' येत्या १ मार्च पासून पूर्णपणे बंद होणार असल्याचा दावा खोटा असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. यूटीएस ॲपवरून फक्त नवीन मासिक पास काढण्याची सुविधा बंद केली आहे, मात्र ॲपवर काढलेले जुने पास त्यांचा कालावधी संपेपर्यंत वैध राहतील. भारतीय रेल्वेने ‘रेल वन’ हे नवीन ॲप सुरू केलं असलं, तरी ‘यूटीएस’ ॲप बंद करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं. ‘रेल वन’ ॲ पूर्णपणे कार्यान्वित करण्याची प्रक्रिया...

December 21, 2025 1:46 PM

views 40

रेल्वेची भाडेवाढ येत्या २६ डिसेंबर पासून लागू होणार

रेल्वेने प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या २६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य  वर्गाच्या प्रवासाकरता प्रतिकिलोमीटर एक पैसा तर मेल - एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर २ पैसे भाडेवाढ झाली आहे. ५०० किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता १० रुपये जास्त मोजावे लागतील. उपनगरी गाड्याच्या प्रवासभाड्यात बदल केलेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

December 19, 2025 9:41 AM

views 32

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या

आगामी नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देशातल्या नऊ विभागात 138 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. या गाड्यांच्या एकंदर 650 फेऱ्या होणार असून यातील 244 फेऱ्यांबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष प्रवाशांना विनासायास साजरं करता यावं यासाठी या विशेष गाड्यांद्वारे अतिरिक्त क्षमता, सुविधा आणि सेवा पुरवण्याचा प्रयत्न असल्याचं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.

September 24, 2025 1:36 PM

views 30

वंदे भारत स्लीपर गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार

झोपण्याच्या बर्थची सोय असलेल्या दोन वंदे भारत  गाड्या लौकरच प्रवाशांच्या सेवेत येतील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितलं. यातल्या एका गाडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून दुसरीच्या चाचण्या १५ ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. १६ डब्यांची ही पूर्ण वातानुकूलित गाडी ताशी  १८० किलोमीटर पर्यंत वेगाने धावू शकेल.     दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी  १२ हजार विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील असं वैष्णव य...

August 19, 2025 7:58 PM

views 17

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या

राज्यातल्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेनं गाड्यांच्या ३६७ अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी गणेशभक्तांच्या वतीनं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी महाऱाष्ट्र शासनानं केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत, गणेशभक्तांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांच्या जादा फेऱ्यांचं नियोजन केलं जाईल, ...

August 9, 2025 3:03 PM

views 17

रुद्रास्त्र या साडेचार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मालगाडीची यशस्वी चाचणी

भारतीय रेल्वेनं रुद्रास्त्र या साडेचार किलोमीटर लांबीच्या मालगाडीची यशस्वी चाचणी घेतली. उत्तर प्रदेशातल्या चंदौलीत गंजख्वाजा स्थानकापासून झारखंडमधल्या गरवा स्थानकादरम्यानच्या २०९ किलोमीटरच्या टप्प्यात या गाडीची चाचणी घेतली. या गाडीनं ताशी साडेचाळीस किलोमीटर या वेगानं ५ तास १० मिनिटात हे अंतर पार केलं. ही आशियातली  सर्वात लांब मालगाडी असून मालवाहतूक आणि मालाची चढउतार जलद होईल, त्यामुळे साधनसंपत्तीची आणि वेळेचीही बचत होईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी या गाडीच्या चाचणीव...

July 31, 2025 7:30 PM

views 29

गणेशोत्सवासाठी ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या धावणार !

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त या ६ गाड्या चालवण्यात येणार असून यामुळे आता गणपती विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या ३०२ झाली आहे. या गाड्यांसाठीचं आरक्षण पुढच्या महिन्यात ५ तारखेपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसंच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

April 27, 2025 3:28 PM

views 11

अक्षय्य तृतीयेनिमित्त विशेष रेल्वेगाड्या

३० एप्रिल रोजी होणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बांद्रा टर्मिनस ते भावनगर दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्राप्त माहिती नुसार बांद्रा टर्मिनस ते भावनगर टर्मिनस विशेष सुपरफास्ट गाडी २९ एप्रिलला बांद्रा ते भावनगर आणि ३० एप्रिलला भावनगर ते बांद्रा असा प्रवास करेल.   

March 22, 2025 7:53 PM

views 22

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक असणार आहे.    वेस्टर्न मार्गावर सकाळी १० वाजून ३५ मिनिटं ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटं या कालावधीत यंत्रणांच्या डागडुजीसाठी जम्बोब्लॉक होणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद मार्गावरून धावणाऱ्या सर्व लोकल धिम्या मार्गावरून धावतील. तसंच काही रेल्वे रद्द केल्या असून चर्चगेटला जाणाऱ्या काही रेल्वे वांद्रे किंवा दादर इथपर्यंतच धावतील.   सेंट्रल मार्गावर सकाळी १० वाजून ५८ मिनिटं ...

March 17, 2025 5:47 PM

views 18

रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील-रेल्वेमंत्री

रेल्वेमध्ये गेल्या १० वर्षांत  ५ लाख रोजगारनिर्मिती झाली असून रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात २०२० पासून वाढ झाली नसून आसपासच्या अनेक देशांपेक्षा भारतातला रेल्वेप्रवास अधिक किफायतशीर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. रेल्वे अपघातांच्या प्रमाणात २००५-०६ च्या तुलनेत ९० टक्क्यांची घट  झाल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्यात सुमारे साडेचार कोटी प्रवा...