November 14, 2024 7:36 PM
28
केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप
केंद्र सरकारच्या धोरणनिर्मितीत आदिवासी अधिकाऱ्यांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते. देशात आदिवासींची लोकसंख्या ८ टक्के आहे, मात्र त्यांना सोयी सुविधा नाकारल्या जातात. ही परिस्थिती बदलायची असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागेल, असं गांधी म्हणाले. प्रत्येक समुदायाच्या संख्येनुसार त्यांची भागीदारी सुनिश्चित केली जाईल, आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा काढून टाकली जाईल, शे...