April 16, 2025 3:40 PM April 16, 2025 3:40 PM

views 8

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याचा काँग्रेसचा आरोप

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या प्रकरणी या दोन नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपनं काँग्रेसवर टीका केली असूनची काँग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच हा खटला दाखल झाला असून, त्यावर राजकारण करण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाही, असं भाजप खासदार...

March 13, 2025 1:43 PM March 13, 2025 1:43 PM

views 26

नीट परीक्षेतली पेपरफुटी हे केंद्र सरकारचं अपयश – राहुल गांधी

नीट परीक्षेतली पेपरफुटी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि सरकारांनी मतभेद बाजूला सारत एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे त्यांनी नीट पेपरफुटी प्रश्नी सरकारवर टीका केली. सहा राज्यांतल्या ८५ लाख मुलांचं भविष्य या पेपरफुटीमुळे टांगणीला लागलं आहे. तरुणासांठी हा धोकादायक पद्मव्यूह बनला आहे, अशी टीका त्यांनी केली.

March 6, 2025 8:35 PM March 6, 2025 8:35 PM

views 14

काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर

लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईतल्या धारावीला आज भेट दिली. धारावी इथं असलेल्या चमार स्टुडिओला भेट देत कारागिरांशी संवाद साधला.    धारावीत उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वसमावेश उत्पादन साखळीच्या निर्मितीवर भर द्यावा, असा आग्रह राहुल गांधी यांनी केला. चमार स्टुडिओ हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचंही गांधी यांनी सांगितलं.

February 18, 2025 3:16 PM February 18, 2025 3:16 PM

views 26

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री जाहीर करणं अशोभनीय – राहुल गांधी

निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असताना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री जाहीर करणं, प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना अशोभनीय असल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.   सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्यानं काल रात्री या निवडीसाठी आयोजित केलेली बैठक पुढं ढकलण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली होती. आपलं मत वेगळं असल्याचं पत्रही निवड समितीला दिलं होतं, असं त्यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं आहे. ते निवड सम...

February 14, 2025 1:17 PM February 14, 2025 1:17 PM

views 20

प्रधानमंत्री अदानींच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरण दडपत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  प्रधानमंत्र्यांना देशात प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते मौन बाळगतात, आणि परदेशात विचारले जातात तेव्हा ती वैयक्तिक बाब असल्याचं सांगतात. मोदी यांनी अमेरिकेतही अदानींच्या भ्रष्टाचारावर पांघरून घातलं आहे, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

February 3, 2025 5:48 PM February 3, 2025 5:48 PM

views 12

देशात बेरोजगारीचा प्रश्न अद्यापही कायम असून सरकारला तो सोडवण्यात अपयश-राहुल गांधी

देशात बेरोजगारीचा प्रश्न अद्यापही कायम असून सरकारला तो सोडवण्यात अपयश आल्याचं टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. संसदेच्या संयुक्त सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेत ते बोलत होते. सकल राष्ट्रीय उत्पादन १५ पूर्णांक ३ शतांश टक्क्यांवरून १२ पूर्णांक ६ शतांश टक्क्यांपर्यंत घसरलं असून हे गेल्या साठ वर्षांतलं सर्वात कमी उत्पादन आहे, असंही गांधी यावेळी म्हणाले. मेक इन इंडिया ही चांगली कल्पना असूनही तिची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरल...

November 27, 2024 8:19 PM November 27, 2024 8:19 PM

views 15

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरचे लाचखोरीचे आरोप गंभीर असून त्यांना अटक करावी- राहुल गांधी यांची मागणी

अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.  लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात अदानी प्रकरण तसंच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधला हिंसाचार या मुद्द्यांवरून गदारोळ झाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली. मात्र, विरोधकांनी सभागृहाच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे सभागृहाचं क...

November 18, 2024 1:20 PM November 18, 2024 1:20 PM

views 14

महायुतीमुळे ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

राज्यातल्या ५ लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार, महागाई, महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत, असं सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला.   धारावी पुनर्विकास प्रकल्पासह विमानतळं, ...

November 16, 2024 6:45 PM November 16, 2024 6:45 PM

views 27

महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं प्रचारसभेत दिलं. मोदी सरकारनं देशातल्या मूठभर उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज माफ केली, असं ते म्हणाले.    जीएसटीच्या माध्यमातून सरकार जनतेची लूट करत असून बड्या भांडवलदारांना कोट्यवधी रुपयांची सूट दिली जात आहे, अशी टीका गांधी यांनी केली.   राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव तसंच कांद्याला विशेष समिती नेमून योग्य भाव देण्यास...

November 14, 2024 7:36 PM November 14, 2024 7:36 PM

views 20

केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

केंद्र सरकारच्या धोरणनिर्मितीत आदिवासी अधिकाऱ्यांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते. देशात आदिवासींची लोकसंख्या ८ टक्के आहे, मात्र त्यांना सोयी सुविधा नाकारल्या जातात. ही परिस्थिती बदलायची असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागेल, असं गांधी म्हणाले. प्रत्येक समुदायाच्या संख्येनुसार त्यांची भागीदारी सुनिश्चित केली जाईल, आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा काढून टाकली जाईल, शे...