November 29, 2025 7:00 PM

views 51

केवळ सव्वा ३ लाख शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक वीमा

रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आत्तापर्यंत केवळ ३ लाख २६ हजार १६८ शेतकऱ्यांनी २ लाख ६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता. राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकंदर विमा रक्कम ८२० कोटी रुपये आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५० हजार ४६२ शेतकऱ्यांनी ३३ हजार १२ हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड आणि लातूर जिल्ह्याचा क्रमांक आहे. शेवटच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्यामुळं...

October 28, 2025 6:58 PM

views 39

Cabinet Decisions: रबी हंगामासाठी खतांवर ३७,९५२ कोटी अनुदान

रबी हंगामासाठी खतांवर ३७ हजार ९५२ कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील, असं वैष्णव म्हणाले. खतांचे आंतरराष्ट्रीय दर लक्षात घेऊन खतांच्या अनुदानाचे नवे दर निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. हे दर एक ऑक्टोबरपासून लागू होतील.    आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना आज केंद्रीय मंत्रिम...

December 3, 2024 9:18 AM

views 17

रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात दीडपटीने वाढ

राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे गतवर्षीपेक्षा रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात सुमारे दीडपटीने वाढ झाली आहे. ज्वारी, गहू, मकाच्या पेरणी क्षेत्राच्या वाढीबरोबरच यंदा तेलबियांच्या पेरणीचं क्षेत्र वाढलं आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात, आधीच्या सरासरी 54 लाख हेक्टर क्षेत्रावरून या वर्षी सरासरी 60 लाख हेक्टरवर पेरण्या होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.