January 11, 2026 7:52 PM

views 32

या आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट, स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४ पूर्णांक ४ दशांश टक्क्यापर्यंत रोखणं शक्य असल्याचा पीडब्ल्यूसीचा अहवाल

चालू आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ४ पूर्णांक ४ दशांश टक्केपर्यंत रोखण्याचं उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता असल्याचं पीडब्ल्यूसी या पतमानांकन संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. ही तूट यापेक्षाही कमी राहील, आणि यामुळे आर्थिक व्यवस्थापनातली भारताची मजबूत स्थिती जागतिक पातळीवर अधोरेखित होत असल्याचं या संस्थेचे प्रतिनिधी राणेन बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.