September 14, 2025 4:07 PM
36
आसाममध्ये पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन
भारत जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश असून त्याचप्रमाणे आसाम देखील देशातल्या सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममध्ये दरांग इथं १८ हजार ५३० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आसामचा विकास जलदगतीनं करण्याचा डबल इंजिन सरकारचा निर्धार आहे, संपूर्ण देश आज विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीनं कार्य करत असून त्यात मुख्यत्वे युवावर्ग...