July 6, 2024 10:26 AM July 6, 2024 10:26 AM

views 13

रबी हंगामातील कांद्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर

शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या रबी हंगामातील कांद्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात कांद्याचं उत्पादन कमी असूनही देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता पुरेशी असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या रबी हंगामात अंदाजे 191 लाख टन कांद्याचं उत्पादन देशांतर्गत वापरासाठी पुरेसं आहे असं मंत्रालयानं सांगितलं.

June 13, 2024 7:32 PM June 13, 2024 7:32 PM

आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ

आवक घटल्याने कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे.  नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे आवक घटली असून त्याचा परिणाम किमतीवर झाल्याचं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं.