September 6, 2024 1:29 PM

views 23

जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं – प्रधानमंत्री

जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी केलं आहे. गुजरातमधे  सूरत इथे,  'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ दूरस्थ पद्धतीने  केल्यानंतर ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेने विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जलसंचयानेच तोडगा निघू शकतो असं ते म्हणाले. सध्या सुरू असलेल्या 'जल श...

September 6, 2024 10:14 AM

views 30

गुजरातमध्ये सूरत इथे ‘जलसंचय जन भागीदारी’ अभियानाचा प्रधानमंत्र्याच्या हस्ते आज शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत इथे, दूरस्थ माध्यमातून, 'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. सध्या सुरू असलेल्या 'जल शक्ति अभियानाशी' हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था,उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात 'रेन हार्वेस्टींग' करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाअंतर्गत, गुजरातमध्ये सामुदायिक भागीदारीतून सुमारे २४ हजार ८०० बांधकामं केली ज...

September 5, 2024 1:42 PM

views 20

आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला आजपासून सुरुवात

गेल्या दहा वर्षांत भारताची सौर उर्जा क्षमता ३२ पटींनी वाढली असून हा वेग कायम राहिला तर २०३०पर्यंत देश ५०० गिगा वॅट इतकी सौर उर्जा निर्मिती करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्ली इथे आयोजित दोन दिवसांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला प्रधानमंत्री मोदी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. भारताने गेल्या काही वर्षांत हरित ऊर्जा निर्मितीत मोठी प्रगती केली आहे. भारतासह जगभरातही अनेक संस्कृतींनी सूर्याचं महत्त्व सांगितलं आहे. या महोत्सवाद्वारे सूर्याचा उत...

September 5, 2024 1:22 PM

views 16

भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे १६० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे १६० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रुनेईचा यशस्वी दौरा आटोपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल सिंगापूर इथं पोहोचले. त्यानंतर मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि सिंगापूर दरम्यान आरोग्य आणि औषध, शिक्षण आणि कौशल्य विकास, डिजिटल तंत्रज्ञान आणि भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारी या क्षेत्रातील सहका...

September 4, 2024 8:05 PM

views 14

ब्रुनेईचा दौरा आटोपून प्रधानमंत्री सिंगापूरमधे दाखल

दोन देशांच्या दौऱ्यातल्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरमधे पोहोचले. सिंगापूरचे गृह आणि कायदा मंत्री के षण्मुगम यांनी त्यांचं स्वागत केलं. सिंगापूरमधल्या भारतीय समुदायानं लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री या दौऱ्यात सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग आणि इतर मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. भारत सिंगापूर धोरणात्मक संबंधांविषयी, तसंच क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल.   प्रधानमंत्र...

September 2, 2024 1:16 PM

views 17

प्रधानमंत्री उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभागाचे सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.   भारत ब्रुनेई राजनैतिक संबंधांना ४० वर्ष पूर्ण होत असताना हा दौरा होत असून ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय प्रधानमंत्री आहेत, असं ते म्हणाले. ब्रुनेईचा दौरा झाल्यानंतर प्रधानमंत्री सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरच्या प्रधानमंत्र्यांच्या आमंत्रणावरुन ते तिथे जाणार असून या भेटीत अनेक मह...

September 2, 2024 10:50 AM

views 19

उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, उपाध्याय यांच्या निधनानं पत्रकारितेच्या जगाचं न भरून येणारं नुकसान झालं असल्याचं समाजमाध्यमांवरुन दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.   उपाध्याय 64 वर्षांचे होते. दक्षिण दिल्लीतल्या वसंत कुंज भागात त्यांच्या घराच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहाणी करताना चौथ्या मजल्यावरुन उपाध्याय पडले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

September 2, 2024 9:34 AM

views 38

आंध्र प्रदेश, तेलंगणमधील पूरस्थितीचा प्रधानमंत्र्यांनी घेतला आढावा

  प्रधानमंत्रीं नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करुन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मत करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं आहे. राज्य सरकार युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे. विजयवाडा जिल्ह्यात पुरामुळे बुडामेरू ओढ्याला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना अन्न, पाणी आणि आवश्यक औषधांचा व्यवस्थित पुरवठा करावा असे आदेश अधिका...

August 31, 2024 7:09 PM

views 26

महिला सुरक्षेचे कायदे सक्रिय करण्याची आणि या प्रकरणांचा निकाल लवकर लावण्याची गरज प्रधानमंत्र्यांच्याकडून व्यक्त

देशात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कडक कायदे लागू केले आहेत. हे कायदे आणखी सक्रीय करायची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. अशा प्रकरणांचे निकाल जितक्या लवकर लागतील, तितकी आपण सुरक्षित असल्याची खात्री महिलांना पटेल, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्यांनी आज केलं. त्यानंतर ते बोलत होते.  सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एक विशेष टपाल तिकीट आणि एका नाण्याचं प्रकाशनही मो...

August 31, 2024 3:39 PM

views 32

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

वंदे भारत रेल्वेगाड्यांचा वाढता विस्तार, आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मीरत-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोईल या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे देशातली महत्त्वाची शहरं आणि ऐतिहासिक शहरं जोडली जातील, मंदिरांचं शहर असा लौकिक असलेलं मदुराई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या बेंगळुरूशी जोडलं जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी यावे...