March 16, 2025 7:47 PM
18
शांततेविषयी भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
भारत हा उदासीन नाही, तर शांततेसाठी ठामपणे वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. एआय संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे, त्यामुळे भारत जेव्हा शांततेविषयी बोलतो तेव्हा जग ऐकतं, भारतीय नेहमी सद्भावना आणि शांततेसाठी ठाम भूमिका घेतात, असंही ते यावेळी म्हणाले. या मुलाखती दरम्यान मोदी यांनी यूक्रेन आणि रशिया संघर्षावरच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. दोन्ही देश जेव्हा वाटाघाटी करण्या...