August 7, 2025 1:24 PM

views 35

दोन्ही सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध प्रश्नांवर केलेली चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला. गदारोळामुळे दोन्ही सदनाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२५ लोकसभेत मांडलं. पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुढे चालवण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरु...

July 22, 2025 1:36 PM

views 23

संसद भवन संकुलात इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक

संसद भवन संकुलात आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनासाठी एक रणनीती आखण्यावर यात चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं.   दरम्यान, बिहारमधे सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू अर्थात मतदार यादी पुररिक्षणाच्या विरोधात आज संसद भवन परिसरात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शनं केली. या पडताळणीच...

July 22, 2025 1:17 PM

views 37

दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.   लोकसभेत सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरु केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे महत्त्वाचे प्रश्न पटलावर असल्यानं शांतपणे कामकाज चालू द्यावं, असं सभापती बिरला यांनी सदस्यांना सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसि...

July 19, 2025 8:22 PM

views 34

संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून, उद्या सर्वपक्षीय बैठक

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता  सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल .