January 22, 2025 7:30 PM

views 38

संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात, तसंच वर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागात यंदाच्या पावसाळ्यात संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजार रुपयांची मदत राज्य शासनानं मंजूर केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती दिली.