May 15, 2025 7:54 PM May 15, 2025 7:54 PM

views 4

ऑपरेशन सिंदूरची जगभरात प्रशंसा

ऑपरेशन सिंदूरची जगभरातून प्रशंसा होत आहे. दीर्घ काळापासून अशी मोहीम राबवण्याची आवश्यकता होती असं ब्रिटीश लेखक आणि राजकारण विश्लेषक डेव्हिड व्हान्स यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान  अपयशी,  आणि दहशतवादी कारवायांचं माहेरघर असल्याचं मत त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना व्यक्त केलं. पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन करताना  पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी दहशतवाद्यांना केवळ हल्लेखोर असं संबोधलं याबद्दल त्यांनी टीका केली.

May 15, 2025 7:49 PM May 15, 2025 7:49 PM

views 7

देशात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान, आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भाजपातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरु आहे. २३ मेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.    गुजरातमधे मोतीबाग टाऊन हॉल पासून शहीद मेमोरियलपर्यंत काढलेल्या भव्य तिरंगा यात्रेला केंद्रीय मंत्री निमुबेन बांभनिया यांनी झेंडा दाखवला. राज्याचे मंत्री हर्ष संघवी गांधीनगर इथल्या तिरंगा यात्रेत सहभागी झाले. जामनगरमधे ८ किलोमीटर लांबीची मिरवणूक काढण्यात आली.    जम्मू-कश्मीरमधे श्रीनगर इथं काढलेल्या तिरंगा यात्रेच...

May 15, 2025 4:06 PM May 15, 2025 4:06 PM

views 21

‘ऑपरेशन सिंदूर’ ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादाविरुद्ध केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केलं. ते आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यासाठी श्रीनगर इथे पोहोचल्यानंतर संरक्षण दलांना संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. संरक्षण मंत्री आणि देशाचा नागरिक म्हणून मी तुमचे आभार मानतो, अशा शब्दांत सिंह यांनी संरक्षण दलांचं कौतुक केलं. संपूर्ण देशाच्या शुभेच्छ...

May 14, 2025 7:30 PM May 14, 2025 7:30 PM

views 18

ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपाने तिरंगा यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यात सहभागी झाले होते. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पहलगाममधे दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे नागरिकांची हत्या केली. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत  करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असं मुख्यमंंत्र्यांनी सांगितलं.   पाकिस...

May 14, 2025 3:28 PM May 14, 2025 3:28 PM

views 21

ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षण विषयक तज्ञांकडून कौतुक

दहशतवादाविरोधात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षण विषयक तज्ञांनी कौतुक केलं आहे. अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी डॉन स्पेन्सर आणि ऑस्ट्रियातले तज्ञ लेखक टॉम कूपर यांनी या नेमक्या हालचालींबद्दल तसंच हवाई दल आणि लष्कराच्या योग्य वापराबद्दल या कारवाईची प्रशंसा केली आहे. दहशतवादाविरोधात लढताना अण्वस्त्रांच्या धमकीसमोर न झुकण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका प्रशंसनीय असल्याचा उल्लेख दोन्ही तज्ज्ञांनी आपापल्या समाज माध्यमावरच्या लिखाणात केला आहे.

May 13, 2025 1:20 PM May 13, 2025 1:20 PM

views 14

ऑरपेशन सिंदूर स्थगित, मात्र दहशतवादाशी लढा सुरूच राहील – प्रधानमंत्री

भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' स्थगित केलं आहे; ते थांबवलेलं नाही, दहशातवादाविरुद्धची लढाई चालूच राहील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. दहशतवादाला खतपाणी घालणारं सरकार आणि दहशतवादी संघटना वेगवेगळ्या नसून पाकिस्तानच्या हालचालींवर  भारताचं लक्ष आहे असं त्यांनी सांगितलं.   पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं; त्यानंतर प्रथमच प्रधानमंत्र्यांनी काल राष्ट्राला संबोधित केलं. एकीकडे प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षिततेबाबत आश्वस्त करतानाच त्यांनी ...

May 13, 2025 10:57 AM May 13, 2025 10:57 AM

views 15

पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवादावरच, प्रधानमंत्र्यांची स्पष्टोक्ती

पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावरच होईल, पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल आणि हेच आमचं स्पष्ट धोरण आहे, असा परखड इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दिला. 'पाकिस्तानला टिकून राहायचं असेल तर त्यांना दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करावीच लागतील; दहशतवाद आणि चर्चा एकत्र होणार नाही, दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहणार नाही. पाणी आणि रक्त देखील एकत्र वाहू शकत नाही', असा सज्जड इशारा प्रधानमंत्री मोदी यांनी दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाक...

May 12, 2025 9:41 AM May 12, 2025 9:41 AM

views 10

ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधातल्या भारताच्या इच्छाशक्तीचं प्रतीक – संरक्षणमंत्री

ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नसून ती देशाची राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक ईच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ही कारवाई दहशतावादाविरोधातल्या भारताच्या जबरदस्त इच्छाशक्तीचं तसंच लष्करी क्षमता आणि दृढनिश्चयाचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. लखनऊ इथं ब्रह्मोस एरोस्पेस एकीकरण आणि परीक्षण सुविधेचं उद्घाटन काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून झालं; त्यावेळी ते बोलत होते.

May 11, 2025 8:16 PM May 11, 2025 8:16 PM

views 17

ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी, तर पाकचे ३५ ते ४० जवान ठार

पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी आज दिली.   लष्करी कारवाई महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई कारवाई महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती आणि नौदल कारवाई महासंचालक व्हाइस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत देऊन भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले.  &...

May 11, 2025 5:04 PM May 11, 2025 5:04 PM

views 21

ऑपरेशन सिंदूरला उद्योग क्षेत्राचा पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रसरकारनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला देशातल्या उद्योग क्षेत्रानं पाठिंबा दिला आहे. ही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आवश्यक कृती होती आणि देशातलं उद्योगक्षेत्र सरकारच्या पाठिशी आहे असं CII, अर्थात भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी सांगितलं. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात उद्योगक्षेत्राचं सरकारला समर्थन आहे,असं ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.