March 11, 2025 8:57 PM March 11, 2025 8:57 PM
15
नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन करत कांदा लिलाव बंद
नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथे आज शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले. गुरुकृपा आडत संघटनेच्या व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदीचे तीन कोटी रुपये थकवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चार महिने होऊनही थकबाकी मिळालेली नाही, शेतमालाचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आंदोलन सुरू असलं तरी बाजार समितीने केलेल्या मध्यस्थीमुळे लिलाव पूर्ववत सुरू झाले.