May 9, 2025 7:40 PM May 9, 2025 7:40 PM

views 12

अहिल्यानगर जिल्ह्यात १३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन

सूरत ते चेन्नई या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महामार्गामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार ३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.   सूरत ते चेन्नई या सोळाशे किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा काही भाग महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. या रस्त्यालगतची जमीन संपादित करून तिथे औद्योगिक विकास केला जाऊ शकतो, असंही ते यावेळी म्हणाले. अहिल्यानगर-शिर्ड...

February 7, 2025 7:24 PM February 7, 2025 7:24 PM

views 9

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात, गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडनवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ औद्योगिक महोत्सवाचं’ उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या 'पोलाद क्रांती'चा फायदा या संपूर्ण प्रदेशाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ वर्षांत गडचिरोली हे देशाचं पोलाद उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल, असा ...

February 2, 2025 8:12 PM February 2, 2025 8:12 PM

views 16

आदिवासीबहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आदिवासीबहुल भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागसलेपण दूर करणं सर्वांत मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर मध्ये एम्स इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित फिस्ट २०२५ या परिषदेच्या उद्घाटनावेळी गडकरी आज बोलत होते.   सेवा आणि उत्पादन क्षेत्राचं जीडीपीमधलं योगदान वाढवण्यासाठी सरकारनं दुर्गम भागांना प्राधान्य दिलं आहे, आदिवासीबहुल भागाच्या सर्वसमा...

January 24, 2025 3:57 PM January 24, 2025 3:57 PM

views 7

ॲडव्हान्टेज विदर्भ महोत्सवात ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार- नितीन गडकरी

नागपुरात आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ २०२५ या औद्योगिक महोत्सवात ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   तसंच ६७० कोटी रुपयांचा मदर डेअरी चा प्रकल्प लवकरच नागपुरात सुरु होणार असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. हा महोत्सव ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. विदर्भाच्या औद्योगिक वाढीसाठी एक प्रमुख गुंतवणूक स्थळ म्हणून प्रोत्साहन देणं...

December 12, 2024 7:43 PM December 12, 2024 7:43 PM

views 14

रस्ते अपघातग्रस्तांसाठी विनारोकड उपचार योजना लवकरच लागू होणार

रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकतील, असं गडकरी म्हणाले.    लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांसंदर्भात विविध सदस्यांनी प्रश्न विचारले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महामार्ग भूसंपादनात शेतकऱ्यांना किरकोळ मोबदला मिळत असल्याचा मुद्दा...

November 11, 2024 7:56 PM November 11, 2024 7:56 PM

views 12

काटोल ते नागपूर रस्त्याच्या कामाला मंजूरी – मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात कटोल इथं महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. मेटमांजरा आणि भागातलं ८ किलोमीटरचं वनविभागानं अडवून ठेवलेल कामासाठी १५० कोटी रूपये वाढवून काटोल ते नागपूर रस्त्याचं कामाला मंजूरी दिली असल्याचं त्यांनी म्हटलं. यामुळे नागपूरवरून अमरावतीला जाण्यासाठी पर्यायी मार्ग सुरु झाल्याचं त्यांनी सांगितलं.   काटोल, नारखेड, वरुड, मोरशी या भागात कमी होत असलेल्या पाण्याच्या पातळीसाठी जलसंवर्धनाचा उपक्रम राबवून, प्रत्येक विहरीवर सोलर पंप लाव...

October 29, 2024 1:47 PM October 29, 2024 1:47 PM

views 14

भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी – मंत्री नितीन गडकरी

भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. मुंबई इथं भारत-स्पेन सीईओ फोरमला ते आज संबोधित करत होते, यावेळी स्पेनचे राष्ट्राध्यक्ष एच ई  पेद्रो सँचेज उपस्थित होते. दळणवळ, पायाभूत सुविधा आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांची भागीदारी असं गडकरी म्हणाले. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देईल, अशा आर्थिक संबंधांना बळकटी देण्यासाठी हा संवाद मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

October 17, 2024 8:18 PM October 17, 2024 8:18 PM

views 6

पर्यायी इंधनांमुळे भारताचं पेट्रोलियमवरचं अवलंबित्व कमी होऊन आयातीत घट होऊ शकते -नितिन गडकरी

मिथेनॉल, इथेनॉल आणि बायो सीएनजी सारख्या पर्यायी इंधनांमुळे भारताच पेट्रोलियमवरचं अवलंबित्व कमी होऊन आयातीत घट होऊ शकते असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत नीती आयोगाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मिथेनॉल कार्यशाळेत बोलत होते. सध्या पेट्रोलियमच्या आयातीवर दरवर्षी २२ लाख कोटी रुपये खर्च होतात. पर्यायी इंधन उत्पादन वाढल्यास हा खर्च घटेल , शिवाय प्रदूषणही कमी होईल असं ते म्हणाले. भारत जैविक इंधनाच्या उत्पादनात विशेषतः मिथेनॉलच्या उत्पादनात ...

September 22, 2024 3:41 PM September 22, 2024 3:41 PM

views 3

मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा

दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा केली आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मंत्री रामदास आठवले यांना आज नागपूरमध्ये गडकरी यांच्या हस्ते प्रदान केला गेला, त्यावेळी ते बोलत होते.   मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बौद्ध समाजात अनेक गट आहेत, त्यामुळे आपली ताकद वा...

September 3, 2024 7:55 PM September 3, 2024 7:55 PM

views 5

रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची – मंत्री नितीन गडकरी

रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टनलिंग इंडियाच्या दुसऱ्या परिषदेला संबोधित करत होते. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार काम करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. कोणताही  प्रकल्प यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि तयार उत्पादनाचं विपणन यावर भर द्यायला हवा, असं त्यांनी सांगितलं.