December 22, 2025 6:37 PM December 22, 2025 6:37 PM

views 29

देशात उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण या विषयावरचा अहवाल प्रसिद्ध

देशात उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण या विषयावरचा अहवाल आज नीती आयोगाने प्रसिद्ध केला. भारतातल्या अग्रगण्य उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने हा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २२ धोरणात्मक शिफारशी, विविध मुद्द्यांवर ७६ उपाययोजना, आणि कामगिरी मूल्यमापनाचे १२५ निकष अहवालात मांडले आहेत. भारतीय संस्थांमधून शिकून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचं संपर्क जाळं तयार करण्याची शिफारसही त्यात केली आहे.  देशातली १६० विद्यापीठं, ३० आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था, तसंच केंद्र आणि ...

October 29, 2025 3:36 PM October 29, 2025 3:36 PM

views 32

नीती आयोगाच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रातल्या रोडमॅपचं प्रकाशन

औद्योगिक उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी संधी असून देश याबाबतीत जगाचं नेतृत्व करेल, तेव्हा महाराष्ट्र देशात आघाडीवर असेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं तयार केलेल्या रोडमॅपचं प्रकाशन आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.   वर्ष २०३५ पर्यंत जीडीपीतलं या क्षेत्राचं योगदान २५ टक्क्यांवर नेणं, १० कोटीपेक्षा जास्त रोजगार निर्माण करणं आणि जगातल्या तीन सर्वोच्...

October 17, 2025 3:14 PM October 17, 2025 3:14 PM

views 23

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेकडून प्रशंसा

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. नवी दिल्ली इथे नीति आयोगाला श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी निरेखा अमरसुरिया यांनी काल भेट दिली. आयोगाचं कामकाज आणि प्रमाणाधारित धोरणनिर्मिती समजून घेण्यात त्यांनी स्वारस्य दाखवलं. अमरसुरिया यांनी श्रीलंकेचा सुधारणांचा प्रवासही यावेळी उलगडून सांगितला तसंच धोरण समन्वयासाठी नीति आयोगास संस्थांची गरज अधोरेखीत केली.    निती आयोगाचे संचालक सुमन बेरी यांनी यावेळी पीएम गतीशक्ती,राष्...

October 10, 2025 3:13 PM October 10, 2025 3:13 PM

views 38

नीती आयोगाचा कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग प्रकाशित

नीती आयोगानं कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग ‘भारतातील करांमधील बदल : गुन्हेगारीकरणाला आळा घालणे आणि विश्वासाधारित प्रशासन ’ आज नवीदिल्लीत प्रकाशित केला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी हा अहवाल प्रकाशित केला. सर्व प्रकारचे दिवाणी पर्याय संपुष्टात आल्यानंतर कोणत्या प्रकरणांमध्ये फौजदारी कलमं लावायची याविषयी यात मार्गदर्शन केलं आहे. कर प्रणातील काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचा फायदा होईल. जागतिक दर्जाची कर प्रणाली निर्माण करुन, अनुपालनाच्या सोप्या आणि न्याय पद्धती ल...

May 24, 2025 8:02 PM May 24, 2025 8:02 PM

views 16

प्रत्येक राज्यानं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं जागतिक मानकं पूर्ण करणारं ‘किमान एक पर्यटन स्थळ’ विकसित करावं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांना सांगितलं. नवी दिल्ली इथं निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवलं, त्यावेळी ते बोलत होते. 'विकसित भारतासाठी विकसित राज्यं २०४७' अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे.   भारताचं झपाट्यानं नागरीकरण  होत असून, शहरांच्या प्रगतीसाठीसाठी नवोन्मेष, विकास आणि शाश्वतता आवश्यक आहे, असं प्रधानमं...

May 24, 2025 1:57 PM May 24, 2025 1:57 PM

views 29

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेची बैठक

नवी दिल्ली इथं निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत आहेत. 'विकसित भारतासाठी विकसित राज्ये २०४७' अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, लेफ्टनंट गव्हर्नर, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशाला विकासाच्या दृष्टीनं भेडसावणाऱ्या समस्या आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी राज्यांची भूमिका याबाबत बैठकीत बहुमत आजमावलं जाण...

December 18, 2024 2:47 PM December 18, 2024 2:47 PM

views 14

भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे – नीती आयोग

दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ते आज पाचव्या स्थानापर्यंतचा भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नीती आयोग, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘भारताच्या बहुविध संक्रमणांवर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेबद्दल त्यांनी माहिती दिली. सर्वात उत्तम अर्थव्यवस्था आप...

December 17, 2024 8:35 PM December 17, 2024 8:35 PM

views 87

मुंबईतल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत दोन दिवसीय परिषद

विकसित भारतासमोरच्या आव्हानांची चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत दोन दिवसीय परिषद पार पडली. यावेळी विकसित भारतासमोरची आव्हानं, त्यांना मिळणारं अर्थसहाय्य, या अर्थसहाय्याचं स्त्रोत याविषयी चर्चा झाल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी दिली. या चर्चांचा उपयोग धोरण निश्चितीसाठी होईल, असं ते म्हणाले. भारतासमोर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा करणं हे मोठं आव्हान असल्याचं कॅलिफोर्निया विद्यापीठातले प्राध्यापक डोनाल्ड हन्ना म्हणाले. कामाच्या ठिकाणी स्री -...

October 1, 2024 8:26 PM October 1, 2024 8:26 PM

views 30

AI क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा निर्माता बनण्याचं देशाचं ध्येय असायला हवं – नीती आयोग

एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण या क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा निर्माता बनण्याचं देशाचं ध्येय असायला हवं असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. एआयचा सर्वाधिक चांगला वापर कृषी आणि आरोग्य क्षेत्रात होऊ शकतो का, यावर संशोधन होऊ शकतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं. नव उद्योजकांसाठी व्यासपीठ असलेल्या मेडटेक मित्र या उपक्रमाविषयीही पॉल यांनी माहिती दिली. या उपक्रमाद्वारे स्टार्टअप्सना उद्योगातलं वितरण तसंच बाजारातल्या स्थित...

September 18, 2024 8:03 PM September 18, 2024 8:03 PM

views 16

२०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने नीती आयोग कार्यरत

भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वर्ष २०३०पर्यंत दुप्पट करणं सहज शक्य असल्याचं मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. २०४७ पर्यंत भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश बनेल आणि दरडोई उत्पन्न २० हजार डॉलर्सच्या आसपास असेल असं भाकित त्यांनी वर्तवलं. हवामान बदलाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर हवामानविषयक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी भारताला आहे असं ते म्हणाले. हरित अर्थव्यवस्थेचा पर्याय स्वीकारण्याची गरज असून...