September 14, 2024 10:31 AM September 14, 2024 10:31 AM

views 6

अमित शहा यांच्याहस्ते 7व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, 7 व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन केलं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेदरम्यान, केंद्र सरकार, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांतील उच्चायुक्तांच्या सहकार्याने, उद्भवणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी एक पथदर्शी आराखडा तयार करण्यात येणार आहे.   शहा यांच्या हस्ते काल पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या डॅशबोर्डचं अनावरण झालं. हा डॅशबोर्ड राष्ट्रीय गुन्हे गोंदण...

September 2, 2024 9:38 AM September 2, 2024 9:38 AM

views 13

न्यायालयांमधला खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

  न्यायलयांमध्ये वर्ग खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी उपाय शोधले पाहिजेत, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केलं आहे. दिल्लीत आयोजित जिल्हा न्याय पालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. न्यायालयासमोर प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणं हे न्याय व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे. दाखल खटले 32 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणं हा गंभीर मुद्दा असून त्यावर साकल्यानं विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   ...

August 6, 2024 11:43 AM August 6, 2024 11:43 AM

views 7

बीमस्टेकच्या व्यापार परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन

बीमस्टेकच्या व्यापार परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारतासह बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या बीमस्टेकच्या सदस्य देशांमधील अनेक मंत्री, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, धोरणकर्ते, उद्योजक उपस्थित असणार आहेत. शाश्वत विकास, व्यापार सुविधा, प्रादेशिक दळणवळण, ऊर्जा सुरक्षा, सर्वसमावेशक वृद्धी आदी मुद्यांवर या परिषदेत चर...

July 31, 2024 11:23 AM July 31, 2024 11:23 AM

views 16

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळात अनेक मंत्री, उपमंत्री आणि व्यापारी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रण धीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. ...

July 31, 2024 10:03 AM July 31, 2024 10:03 AM

views 31

देश वेगानं प्रगती करीत असून सरकारचं प्रत्येक क्षेत्रावर लक्ष असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशवासियांसाठी राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार यावर केंद्र सरकारनं लक्ष्य केंद्रित केल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत काल आयोजित केलेल्या विकसित भारताच्या दिशेने प्रवास- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना मोदी बोलत होते. देशात रोजगाराला चालना देणाऱ्या सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांकडे विशेष लक्ष देण्याचं आश्वासन देऊन, सरकार नागरिकांना रहाणीमानातली सुलभता आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन...

July 30, 2024 1:05 PM July 30, 2024 1:05 PM

views 20

रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात ठरलं अपयशी – पियूष गोयल

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेवर आल्यानंतर देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांच्या रांगेत नेऊन बसवलं, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे, या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना गोयल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.   संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात महागाई दर गगनाला भिडल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ४ पूर्णांक ४ दशांश ट...

July 16, 2024 1:20 PM July 16, 2024 1:20 PM

views 14

अमित शहा नवी दिल्लीत अमली पदार्थविषयक समन्वय केंद्राच्या 7व्या शिखर परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत अमली पदार्थविषयक समन्वय केंद्राच्या सातव्या शिखर परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.गुरुवारी होणाऱ्या या परिषदेत अमित शहा अमली पदार्थ प्रतिबंध माहिती केंद्र म्हणजे मानस या हेल्पलाइनचं उद्घाटन करणार आहेत.   अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या श्रीनगर विभागीय कार्यालयाचंही ते उद्घाटन करणार आहेत. अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी विविध केंद्रीय आणि राज्य सरकारी संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठीच्या उपाययोजनांवर या परिषदेत चर्चा केली जाईल. भारताला 2047 पर्यंत अं...

July 3, 2024 10:51 AM July 3, 2024 10:51 AM

views 16

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज प्रारंभ

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज नवी दिल्ली इथं प्रारंभ होत असून त्याचं उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा प्रत्यक्ष वापर, त्याचे प्रशासन, त्यासाठीच्या बुद्धीकौशल्याचा विकास आणि या विषयातील नवोन्मेष कल्पनांना चालना देणं अशा विविध पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे. जागतिक स्तरावर जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला चालना देण्याचीआपली वचनबद्धता भारतानं यापूर्वीच अधोरेखित केल...

June 28, 2024 11:15 AM June 28, 2024 11:15 AM

views 8

MSME दिवस काल सर्वत्र उत्साहात साजरा

  जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात MSME दिवस काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.केंद्रिय मंत्री जीतम राम मांझी यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उद्यमी भारत या कार्यक्रमांत दोन नवीन योजनांची घोषणा केली. MSME टीम आणि यशस्वीनी अशी या योजनांची नावं आहेत.   डिजीटल कॉमर्स क्षेत्रात ओपन नेटवर्कसाठी पाच लाख लघुउद्योगांना प्रोत्साहन देणं आणिमहिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी तसंच ग्रामीण आणि मागास भागांत महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघुउद्योगांना आवश्यक ती मदत आणि सहकार्य पुरवण्या...

June 25, 2024 3:17 PM June 25, 2024 3:17 PM

views 16

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला – मंत्री प्रल्हाद जोशी

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते.  ऊसापासून साखर तर त्याच्या कचऱ्यापासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ञांना केलं.