December 3, 2024 7:49 PM December 3, 2024 7:49 PM

views 8

नवे फौजदारी कायदे भारतीयांना वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करतील – प्रधानमंत्री

नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी हे देशातल्या नागरिकांसाठी राज्यघटनेत अनुस्यूत असलेल्या आदर्शांची पूर्ती करण्याच्या दिशेनं टाकलेलं ठोस पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणात चंडीगढ इथं नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचं लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. नवे फौजदारी कायदे वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून भारतीयांना मुक्त करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं. या कार्यात योगदान देणाऱ्...

July 23, 2024 7:40 PM July 23, 2024 7:40 PM

views 16

धाराशिवमध्ये भारतीय न्याय संहितेतल्या कायद्यांसंदर्भात जनजागृतीसाठी प्रदर्शन

भारतीय न्याय संहितेतल्या कायद्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीत ध्वनीचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रसरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेलं हे प्रदर्शन दोन दिवस चालणार आहे. नागरिक, कायदेतज्ञ तसंच सामान्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन नवीन कायद्यांची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकाऱ्यांनी केलं आहे.  

July 4, 2024 8:22 PM July 4, 2024 8:22 PM

views 15

नवे फौजदारी कायदे नागरिकांसाठी जीवनसुलभता आणतील – मंत्री अर्जुनराम मेघवाल

नवे फौजदारी कायदे नागरिकांसाठी जीवनसुलभता आणतील असा विश्वास केंद्रीय आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी व्यक्त केला आहे. ते आज उत्तरप्रदेशात गाझीयाबाद इथल्या सीबीआय अकादमीत बोलत होते. या कायद्यांमुळे न्यायदानाची गती वाढेल, आणि खटल्यांमधे खर्च होणारा सर्व संबंधितांचा वेळ वाचेल, असं ते म्हणाले.    यावेळी ३९ सीबीआय अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचं सेवापदक तसंच गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल भारतीय पोलीस पदक मेघवाल यांनी प्रदान केलं. 

July 2, 2024 8:34 AM July 2, 2024 8:34 AM

views 7

नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेला गती मिळेल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

देशभरात कालपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून, यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं, शहा यांनी सांगितलं.

July 1, 2024 8:06 PM July 1, 2024 8:06 PM

views 64

३ नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांची जागा घेणारे हे कायदे संसदेने मागच्या वर्षी संमत केले होते. हे तीन नवे कायदे लागू करण्यापूर्वी सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांशी केंद्र सरकारनं अनेकदा चर्चा केली आहे. त्यामुळे देशभरातली राज्य सरकारं हे कायदे अंमलात आणण्यासाठी सज्ज आहेत. या फौजदारी कायद्यांचा उद्देश शिक्षा देणं नसून न्याय देणं आहे, असं सरकारनं म्हटलं आहे. त्यामु...

July 1, 2024 1:23 PM July 1, 2024 1:23 PM

views 13

नवीन फौजदारी कायदे देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे नवीन फौजदारी कायदे देशभरात आजपासून लागू झाले. केंद्र सरकारने यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत नियमित बैठका घेतल्या होत्या. या नवीन कायद्यांमध्ये चौकशी, सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता - आयपीसी, द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर - सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य होत आहेत. नवीन फौजदारी कायदे लागू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, न्याया...

June 30, 2024 8:34 PM June 30, 2024 8:34 PM

views 18

नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल

स्वातंत्र्याच्या अमृत काळात पारित केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यास तसेच न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.   केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयातर्फे 'फौजदारी कायद्यातील सुधारणा २०२३' या विषयावर आयोजित एक दिवसाच्या चर्चासत्राचा समारोप राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. यावेळी ते बोलत होते.

June 30, 2024 8:25 PM June 30, 2024 8:25 PM

views 11

नव्या फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे परिषद

ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून त्यांच्या जागी भारतीय यंत्रणेने तयार केलेले नवे, कालसुसंगत कायदे आणण्याची गरज कायदेविषयक तज्ञांनी आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आयोजित परिषदेत अधोरेखित केली. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, हे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ही परिषद होत आहे.

June 30, 2024 1:37 PM June 30, 2024 1:37 PM

views 20

तीन नवीन फौजदारी कायदे उद्यापासून देशभर लागू होणार

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, हे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत.नवीन कायद्यांबाबत न्यायाधीश, वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं  विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आज एका परिषदेचं उद्घाटन केंद्रीय कायदा आणि  न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं.  महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कायदा आणि न्यायराज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल,...

June 25, 2024 7:38 PM June 25, 2024 7:38 PM

views 11

पोलिसांनी नवीन फौजदारी कायदे आत्मसात करावेत – उपविभागीय पोलीस अधिकारी बाबू रोहम

देशात १ जुलैपासून भारतीय न्याय संहिता लागू होत आहे. त्यामुळे पोलिसांनी नवीन फौजदारी कायदे आत्मसात करावेत, असं ग्रामीण पोलीस दलातले उपविभागीय पोलीस अधिकारी बाबू रोहम यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात नवीन फौजदारी कायदे - २०२४ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. पोलिसांनी आता जुन्या आणि नव्या कायद्याचा अभ्यास करून तपास करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.