January 10, 2025 9:07 AM

views 31

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ५३५ कोटींहून अधिकची मदत

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पाच लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपयांची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ६८ हजार ८९ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६५ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातल्या एक लाख १२ हजार ६४८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख, ब...