May 19, 2025 1:16 PM May 19, 2025 1:16 PM

views 27

मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून देवरुखला जाणारी कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रत्नागिरीजवळ जगबुडी नदीत कोसळली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.