December 21, 2024 8:16 PM December 21, 2024 8:16 PM

views 3

प्रवासी बोटीला झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १५ वर

मुंबईत गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा गुंफांच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासी बोटीला १८ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १५ झाली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाला सापडला. या मुलाच्या आईचाही या अपघातात मृत्यू झाला होता. भारतीय नौदलाची बोट अनियंत्रित होऊन प्रवासी बोटीला धडकल्याने झालेल्या या अपघातात दोन्ही बोटींमधल्या एकंदर ११३ प्रवाशांपैकी ९८ जणांना वाचवण्यात यश आलं होतं. १३ जण अपघाताच्या दिवशीच मृत्युमुखी पडले, तर दोन जण बेपत्ता होत...

December 19, 2024 7:22 PM December 19, 2024 7:22 PM

views 1

बोट अपघाताच्या तपासाठी नौदलाची विशेष चौकशी समिती स्थापन

उरण इथे काल झालेल्या बोट अपघाताचा तपास करण्यासाठी भारतीय नौदलाने विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. गेटवे ऑफ इंडियावरून काल एलिफंटाला निघालेल्या बोटीला उरण इथे अपघात झाला आणि त्यात १३ जण मृत्युमुखी पडले. यात नौदलाचे चार कर्मचारी आणि ९ प्रवाशांचा समावेश आहे. नौदलाचे दोन कर्मचारी अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. अपघातातल्या जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

December 19, 2024 3:19 PM December 19, 2024 3:19 PM

views 3

प्रवासी बोटीला झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू

गेटवे ऑफ इंडियापासून घारापुरीला जाणारी बोट उलटून काल झालेल्या अपघातात मृतांची संख्या तेरा झाली असून बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. नौदलाची चार हेलीकॉप्टर्स, तटरक्षक दलाची बोट आणि तीन सागरी पोलीस दलाच्या बोटींनी बचावकार्यात भाग घेतला. जखमी झालेल्या एकशेपाच जणांवर वेगवेगळ्या...