December 17, 2025 2:35 PM December 17, 2025 2:35 PM

views 28

मुंबईत पहिलं जेन झी टपाल कार्यालय सुरू होणार

अद्ययावत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं पहिलं जेन झी टपाल कार्यालय मुंबईत सुरू होत असून आयआयटी मुंबई परिसरात उद्या या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे.   जेन झी अर्थात तरुण पिढीला टपाल सेवेकडे आकर्षित करण्यासाठी जेन झी टपाल कार्यालयाची संकल्पना देशभरात राबवली जात आहे. दिल्ली, केरळ, बिहार, गुजरात आणि आंध्रप्रदेशात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईत जेन झी टपाल कार्यालय सुरू होत आहे. मोफत वाय-फाय  सुविधा, कॅफेटेरिया, वाचनालय, संगीत कक्ष या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या कार्यालयात पूर्णपणे डिजिट...

December 11, 2025 7:05 PM December 11, 2025 7:05 PM

views 21

ओसी प्रलंबित असलेल्या मुंबईतल्या इमारतींसाठी राज्य सरकारकडून अभय योजना जाहीर

मुंबईतल्या सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी 'सुधारीत भोगवटा अभय योजना' लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. गेली अनेक वर्ष ओसी, म्हणजेच भोगवटापत्रापासून वंचित असलेल्या दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे.   या योजनेमुळे या इमारतींना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही, घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून सहज कर्ज मिळेल, घरांना योग्य किंमत मिळेल, आणि पुनर्विकासात या इमारतींना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल. त...

December 4, 2025 7:16 PM December 4, 2025 7:16 PM

views 16

नागरिकांची पत्र, पार्सल जलद पोहोचणार…

भारतीय डाक विभागानं नागरिकांची पत्रं आणि पार्सल जलद गतीने पोहोचवण्यासाठी आपल्या ताफ्यात २११ इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश केला आहे. आज मुंबईच्या चकाला इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये या सेवेचा आरंभ करण्यात आला.  या इलेक्ट्रिक दुचाकींंच्या माध्यमातून जीपीओ, चकाला, शीव, दादर आणि काळबादेवी इथल्या पोस्ट ऑफिसमधून या भागातली सर्व प्रकारची पत्रं आणि पार्सल पोहोचवण्यात येणार आहेत.  

November 29, 2025 6:06 PM November 29, 2025 6:06 PM

views 12

मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी – वर्षा गायकवाड

मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली  आहे. त्या मुंबईत हवेच्या गुणवत्ता विषयावर काँग्रेसकडून आयोजित बैठकीत आज बोलत होत्या. दूषित हवेमुळे दरवर्षी मुंबईतले ५ हजार शंभर लोक आपले प्राण गमावतात असं गायकवाड यांनी हावर्ड विद्यापीठाच्या अभ्यासाचा हवाला देऊन सांगितलं.  बेसुमार बांधकाम, वृक्षतोड, पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. मात्र महायुती सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्याची ध...

November 26, 2025 7:25 PM November 26, 2025 7:25 PM

views 17

मुंबईची हवा ‘खराब’ श्रेणीत

मुंबईत आज संध्याकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २२४ इतका नोंदवण्यात आला. हा आकडा अतिशय खराब या श्रेणीत मोडतो. इथियोपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक हे यामागचं कारण असू शकतं, शिवाय, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गुणवत्ता निर्देशांक सामान्यतः घसरलेला असतो.    गेल्या २४ तासात राज्यातल्या काही भागात तपमान घसरलं. येत्या १-२ दिवसात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडच्या राज्यात वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्यानं रविवारपर्यंत खोल समुद्रात मासेमारी टाळण्याचं आवाहन हवामा...

November 26, 2025 7:12 PM November 26, 2025 7:12 PM

views 13

IITच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई टाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईतल्या आयआयटीच्या नावातून बॉम्बेचं काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना दिली.    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. याप्रकरणावरुन ते बोलत होते. 

November 24, 2025 7:04 PM November 24, 2025 7:04 PM

views 35

माहे युद्धनौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल

माहे ही युद्धनौका आज मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार, कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्त्वाचा भाग आहे.युद्धनौकेच्या दाखल झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी...

November 17, 2025 6:22 PM November 17, 2025 6:22 PM

views 19

रायगडमध्ये उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला भूमीपुत्रांचा विरोध

रायगड जिल्हात उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला स्थानिक आणि भूमीपूत्र तीव्र विरोध करत आहेत. या योजने अंतर्गत  धेरंड - शहापूर परिसरात सुमारे ३८७ हेक्टर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या सिनारमास कंपनीच्या प्रकल्पाचं सीमांकन आणि तिथवर जाणाऱ्या रस्त्याच्या भराव कामाला सुरुवात झाली. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज जोरदार निदर्शनं  केली. आधी आपल्या मागण्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

November 12, 2025 2:44 PM November 12, 2025 2:44 PM

views 35

मुंबईत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू

मुंबईत पवई इथे सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य एक कामगार अत्यवस्थ आहे. पवई इथल्या सांडपाणी प्रकल्पातल्या सेप्टिक टँकमध्ये हे दोन कामगार सफाईसाठी उतरले होते. मात्र, सेप्टिक टँकमधल्या गॅसमुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.

November 1, 2025 6:57 PM November 1, 2025 6:57 PM

views 144

मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी मविआचा मोर्चा

मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला आहे. या मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माकपचे राज्य सचिव डॉ अजित नवले, भापकचे सुभाष लांडे सहभागी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास निर्माण झाला असून सत्तेचा सातत्याने गैरवापर केला जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला....