December 26, 2024 1:59 PM

views 12

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मल्याळी लेखक एमटी वासुदेवन नायर यांचं निधन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मल्याळी लेखक एमटी वासुदेवन नायर यांचं काल रात्री केरळमध्ये कोझिकोड इथं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कोझिकोड इथल्या मावूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. केरळ सरकारनं त्यांच्या निधनानंतर राज्यातआज आणि उद्या दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एम टी वासुदेव नायर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनानं  साहित्यविश्वाचं मोठं नुकसान झाल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांन...