August 11, 2025 8:12 PM

views 19

नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर

लोकसभेत आज कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक, २०२५ आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक, २०२५ ही दोन विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर झाली. विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयकं सभागृहात मांडली.    नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक २०२५ हे सहा दशकं जुन्या प्राप्तिकर कायदा, १९६१ ची जागा घेईल. भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या २८५ शिफारसींचा यात अंतर्भाव केला आहे. याआधीच्या प्राप्तिकर व...

August 5, 2025 1:29 PM

views 14

दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

बिहार मधल्या मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.     लोकसभेचं कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरु केली. सभापती ओम बिर्ला यांनी या गदारोळात प्रश्नोत्तरांचा तास सुरु करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ न देणे ही संसदेच्या प्रतिष्ठेला मारक बाब आहे, असंही ते म्हणाले. मात्र गदा...

August 1, 2025 1:16 PM

views 15

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेतही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. आपल्याकडे ३० स्थगन प्रस्ताव आले असून ते फेटाळत असल्याचं उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं. बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणावर चर्चा घेता येणार नाही कारण निवडणूक आयोग संवैधानक संस्था आहे आणि हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे असं हरिवंश यांनी स्पष्ट केलं. मात्र विरोधकांच्या घोषणा चालूच राहील्यानं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

August 1, 2025 1:14 PM

views 9

लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. ११ वाजता कामकाज सुरु झाल्यावर सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, त्याचवेळी विरोधी पक्षांनी बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करावं या मागणीसाठी घोषणा द्यायला सुरुवात केली. प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज आणि इतर महत्त्वाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन सभापतींनी केलं मात्र त्याचा उपयोग झाला नाही. सभापतींनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं.

July 29, 2025 4:10 PM

views 9

राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा

राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चेला सुरुवात केली. पहलगाममधे दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलांना काल यश आलं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ऑपरेशन सिंदूर ही कारवाई विस्तारासाठी नसून स्वसंरक्षणासाठी होती, असं राजनाथ सिंह म्हणाले.    त्याआधी राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर उपाध्यक्ष हरिवंश यांनी शून्य प्रहर पुकारला, मात्र विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी बिहार मतदार यादी सखोल पुनरीक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा घ्यायची मागणी ...

July 28, 2025 1:40 PM

views 23

Monsoon Session 2025 : दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यामुळं लोकसभेचं कामकाज आधी बारा,  नंतर एक आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेतही याच कारणामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं.    लोकसभेत दुसऱ्यांदा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरून वेगवेगळ्या मुद्द्यांवर घोषणाबाजी सुरू केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला यानी विरोधी पक्षाच्या सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं, तसंच समज दिली. मात्र घोषणाबाजी न थांब...

July 20, 2025 2:57 PM

views 14

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं इंडिया आघाडीच्या नेत्यांची काल दूरस्थ पद्धतीनं बैठक झाली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, द्रमुक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इत्यादी पक्षांचे नेते यामध्ये सहभागी झाले होते.   या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपाचे रामगोपाल यादव आणि द्रमुकच्या तिरुची शिवा यांचा समावेश होत...

July 17, 2025 9:01 PM

views 22

राज्यात कायदा सुव्यवस्था विस्कळीत – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना केली. या वर्षी ३१ मेपर्यंत राज्यात १ लाख ६० हजाराहून जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात बलात्काराचे ३ हजार ५०६, घरगुती हिंसाचाराचे सुमारे ४ हजार, तर खुनाचे ९२४ गुन्हे घडल्याचं सांगून, यावर उत्तर कोण देणार, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.    वाढती सायबर गुन्हेगारी, अपुरं पोलीस दल, रखडलेली भर्ती, यात...

July 17, 2025 8:59 PM

views 13

विधानभवन परिसरात आमदारांना मारहाण

आज विधानभवनाच्या प्रांगणात आमदारांना मारहाण झाल्याचे मुद्दे दोन्ही सभागृहांमधे पुढं आले. आपल्याला मारण्यासाठी काही लोकांना बाहेरून आणलं होतं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. तर, आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानभवनाच्या लॉबी मध्ये धक्काबुक्की करण्यात आली, त्याबाबत कारवाई करण्याची मागणी संजय उपाध्याय यांनी सभागृहात केली,  ती तातडीनं करण्यात येईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्...

July 17, 2025 4:34 PM

views 12

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरु करण्याची सभागृहात घोषणा

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरु होतील अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधीमंंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगामार्फत वर्ष २०१५पासून राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरु आहेत.  येत्या पाच वर्षांमध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये अशी केंद्रं सुरु होतील. तसंच राज्यात अठ्ठावीस नवीन टेक्नॉलॉजी लॅब उघडणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं.     सध्या वारणानगर, प्रवरानगर, अमरा...