January 23, 2026 7:54 PM

views 29

दावोसमध्ये यंदा राज्याचे ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार-उदय सामंत

दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीतून राज्यात ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून ४० ते ४२ लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.    दावोसमध्ये एकूण ५१ करार झाले असून, त्यापैकी साडे १६ लाख कोटी रुपयांचे करार उद्योग क्षेत्रातले आहेत. MMRDA अंतर्गत २४ करार झाले असून किंमत सुमारे साडे २९ लाख कोटी रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली.   दावोसमधून येणाऱ्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक २३ लाख कोटी रुपया...

November 14, 2025 6:53 PM

views 25

४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन

स्टार्टअप उद्योग आणि बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यंदाच्या प्रदर्शनात महाराष्ट्राला भागीदार राज्याचा दर्जा मिळाला असून एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित उत्पादनं ६० कक्षांमधे  उपलब्ध आहेत. युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेल्या शिवकालीन किल्ल्यांच्या...

April 20, 2025 5:21 PM

views 47

विश्व मराठी साहित्य संमेलनात साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून १० लाख रुपये

विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केली. त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी तालुक्यातलं मालगुंड, हे पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्यात तो बोलत होते. मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. कोकणानं महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले, तेवढे कोणत्याच प्रांतानं दिले नाहीत, असे गौरवोद्गार...

February 8, 2025 3:40 PM

views 293

विंदा.करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांना जाहीर

राज्यशासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार काल जाहीर झाले. या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव उर्फ रा रं बोराडे यांना जाहीर झाला आहे. श्री.पु. भागवत पुरस्कार, पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनला, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.रमेश सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेलाही भाषा संवर्धनासाठी मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे.   इत...

January 27, 2025 3:28 PM

१००व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

राज्याचे उद्योग मंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर इथल्या १००व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं काल उद्घाटन झालं. राज्यातल्या गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांच्या माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असं सामंत यावेळी म्हणाले. आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी याव...

December 25, 2024 9:22 AM

views 32

दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार

दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पुण्यात होईल अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतली. मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल, तसंच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावं असे निर्देश सामंत यांनी यावेळी दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे; त्याचं महत्त्व तसंच त्यामुळे होणाऱ्या लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. असंही त...

October 14, 2024 3:29 PM

views 21

राज्य शिक्षण मंडळाच्या कोकण विभागाच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन

रत्नागिरी शहराजवळच्या कुवारबाव इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं.   कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज रत्नागिरी रेल्वेस्थानकासमोरच्या श्रमशक्ती स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत कामगारांना आदरांजली वाहिली. कोकण रेल्वेमार्गाची उभारणी करताना कामगार, अभियंते आणि अधिकाऱ्यांनी प्राण गमावले, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १४...