May 2, 2025 7:45 PM

views 11

पुढच्या ४ वर्षांत दुष्काळमुक्त देशासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री सी आर पाटील

पुढच्या चार वर्षांत देशातलं कोणतंही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये, आणि देश दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी आज सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात अस्तगाव इथं गोदावरी उजवा तट कालव्यावरचं बांधकाम आणि अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.  शासन तर आपलं काम करणारंच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं पाण्याचा काटकसरीनं वापर केला पाहिजे, गावातलं पाणी गावातच अडवून साठवावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

January 24, 2025 8:55 PM

views 25

जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध – मंत्री सी आर पाटील

जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध असून या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणत आहे, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी म्हटलं आहे. दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत ते बोलत होते. देशानं अथक परिश्रम करून आपले जलस्रोत लक्षणीय रित्या मजबूत केले आहेत आणि शाश्वत जल व्यवस्थापनात एक जागतिक आधारभूत मापदंड स्थापन केला आहे, ग्रामीण भारतात शुद्ध पेय जल पोहोचवण्यात केंद्र सरकारनं मोठं यश मिळवलं आहे, असं ते म्हणाले.